Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयानं सामान्य मुंबईकरांना फटकारलं, “तुमच्या निष्काळजीपणामुळेच लसीकरण होऊनही कोरोना फैलावतोय!”

October 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
high court mumbai

मुक्तपीठ टीम

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. सणासुदीनंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता उच्च न्यायालयाने नागरिकांना फटकारले आहे. कोरोना रुग्ण वाढण्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूतत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकल प्रवासासाठी लसीकरण सक्तीचे करण्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

 

लसीकरणावरून भेदभावाचा आरोप करणारी याचिका

  • व्यापक जनहितासाठी सरकारने निर्बंध घातले तर त्यात काही गैर नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केल्याकडेही न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने लक्ष वेधले.
  • लसीकरणाच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही आणि त्यांच्यावर असे निर्बध घालणे हे नागरिकांच्या समानतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.
  • मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली.
  • त्यावेळी लसीकरणानंतरही कोरोना अधिक झपाट्याने फैलावत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.

 

कोरोनाची दुसरी लाट ही बऱ्यापैकी ओसरली आहे. यामुळे सरकारने निर्बंध कमी केले आहेत. लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. इतके असताना मात्र सणासुदींच्या दिवसांमुळे कोरोना पुन्हा वाढत आहे. याचं कारण म्हणजे नागरिकांचा निष्काळजीपणा हाच आहे. दिवाळी जवळ आली असताना लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जात आहेत. सोशल डिस्टंटसिंग, मास्क वापरणे इत्यादी कोरोनाचे नियम पाळले जात नाही. यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

 

१०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार

  • कोरोना लॉकडॉऊनमुळे जाहीर केल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
  • त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यावश्यक सेवांमध्ये मुंबई लोकल ट्रेनचा समावेश केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या.
  • यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.
  • मात्र १५ ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला करण्यात आला.
  • लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यापासून दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली.
  • वाढत्या गर्दीमुळे अनेक लोकल फेऱ्या कमी पडत होत्या.
  • तर, नुकताच एका दिवसात ६० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली.
  • कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त २५ टक्के प्रवासी संख्या कमी आहे.
  • या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी ९५ टक्क्यांहून १०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार आहे.

Tags: coronahigh courtVaccinaionउच्च न्यायालयकोरोनालसीकरण
Previous Post

‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Next Post

नवाब मलिकांनी सकाळी ट्वीट केले ते ‘स्पेशल २६’ नेमकं काय?

Next Post
malik special 26

नवाब मलिकांनी सकाळी ट्वीट केले ते 'स्पेशल २६' नेमकं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!