Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी चांगलेच हुशार! सरकारचा प्रस्ताव फेटाळला, दीड नाही तीन वर्षे कृषि कायदे स्थगित करा!!

आज सरकारशी बाराव्यांदा चर्चा

January 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer

मुक्तपीठ टीम

 

दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी चांगलेच हुशार आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्याने सरकारने शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी वादग्रस्त ठरलेले कृषि कायदे दीड वर्षे स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारची क्लुप्ती ओळखत करायचेच असतील तर तीन वर्षे स्थगित करा, असं सांगत दीड वर्षांचा प्रस्ताव फेटाळला. दीड वर्षे उलटल्यानंतर सरकार कायदे आहे तसेच लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तीन वर्षांनंतर २०२४ हे निवडणूक वर्ष असल्याने शेतकऱ्यांना दुखावणारे काही करणे सरकारला परवडणारे नसणार, त्यामुळेच शेतकऱ्यांनी कायदे तीन वर्षे स्थगितीची मागणी केली आहे. आज अकराव्या वेळी शेतकरी सरकारशी चर्चा करताना याच मुद्द्यावर भर देणार आहेत.

 

दिल्ली सीमेवरील कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज ५८ वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत बुधवारी सरकारने एक पाऊल मागे घेत दीड वर्षासाठी नव्या कृषी कायद्यांना स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर शेतकरी आंदोलक सरकारच्या प्रस्तावाशी सहमत होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण तसे झाले नाही.

गुरुवारी दिवसभर शेतकरी नेत्यांची बैठक झाली. रात्री उशिरा शेतकरी नेत्यांनी सरकारचा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगितले. शेतकरी नेते म्हणाले की, सरकारने कायदा रद्द करावा आणि किसान हमी दर मिळायलाच हवा.

 

आज शेतकरी नेत्यांची सरकारबरोबर ११ वी बैठक दुपारी २ वाजता होणार आहे. यात शेतकरी आंदोलक आपला निर्णय सरकारला सांगणार आहेत.

शेतकरी नेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुढील तीन मागण्या ठरवण्यात आल्या:

1. सरकारने नवे कृषी कायदे ३ वर्ष स्थगित ठेवण्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे.
2. प्रति एकर शेती कर्जाची मर्यादा ५ लाखपर्यंत वाढवावी.
3. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी.

 

२६ जानेवारीला आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते आज सलग चौथ्या दिवशी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांशी भेट घेणार आहेत. यापूर्वी तीन वेळा पोलिसांचा शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. गुरुवारी शेतकऱ्यांनी दिल्लीतील आउटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या या मागणीला मान्यता देण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) द्रुतगती महामार्गावर परेड काढण्याचे आवाहन केले, पण शेतकर्‍यांचे ते पटले नाही.

 

तर दुसरीकडे पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी संघटना ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीत व्यग्र आहेत. गुरुवारी पंजाबमधील फिरोजपूर, मोगा, फाजिल्का, जालंधर, मानसा आणि बठिंडा येथून सुमारे १ हजार ८३० ट्रॅक्टरसोबत तब्बल १३ हजार ९५० शेतकरी दिल्लीत रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातूनही शेतकरी आंदोलक, शेतकरी विधवा असे अनेक दिल्लीकडे निघाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिरंगा फटकवत एक लाखाहून अधिक ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.


Tags: 11th Meeting११वी बैठकFarmerFarmer protest 2020Government's proposal rejectedदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरी आंदोलन
Previous Post

मुंडेंविरोधातील तक्रारदार महिलेवर कारवाईची ‘या’ भाजप नेत्यांची मागणी

Next Post

बोगस कागदपत्रांवरुन गृहकर्ज घेऊन फसवणुक करणार्‍या टोळीला अटक

Next Post
home loan

बोगस कागदपत्रांवरुन गृहकर्ज घेऊन फसवणुक करणार्‍या टोळीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!