Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्यावर ठाम!

तर सरकारचा बाहेरील संघटनांवर आंदोलन लांबविण्याचा आरोप  

January 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer

मुक्तपीठ टीम

 

नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये शुक्रवार, २२ जानेवारीला अकरावी बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी संघटना कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि किसान हमी दराला कायदेशीर हमी देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. कृषी कायदे स्थगित करण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला. दरम्यान, कृषिमंत्र्यांनी सांगितले की, शेतकरी नेत्यांच्या हट्टी वृत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर उपाय शोधणे कठीण जात आहे. काल चर्चेची अकरावी फेरी अपूर्ण ठरल्याने शेतकरी नेत्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.

 

११ व्या बैठकीत पुढील बैठकीची तारीख निश्चित केली गेली नाही. शेतकरी संघटना आणि कृषिमंत्री आपापल्या मुद्यांवर ठाम राहीले. तसेच शेतकरी संघटना तीन कृषी कायदे स्थगित ठेवण्यास तयार असतील तर शनिवारपर्यंत सांगावे, त्यानंतरच आपण चर्चा पुढे चालू ठेऊ शकतो, असे सरकारने शेतकरी आंदोलकांना आवाहन केले आहे.

 

बुधवारी झालेल्या बैठकीत सरकारने दिल्लीच्या सीमेवरुन शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतावे यासाठी उपाय शोधत प्रस्ताव दिला की, “एक ते दीड वर्षांपर्यंत कायदे स्थगित करुन संयुक्त समिती स्थापन करु”. मात्र,  नवे कृषी कायदे मागे घेण्याशिवाय इतर कोणताही प्रस्ताव ते मान्य करणार नाही, असे शेतकरी संघनांनी स्पष्ट केले आहे.

शेतकरी संघटनांनी शुक्रवारी सांगितले की, दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत. तसेच बैठकीत सरकारची भूमिका योग्य नसल्याचा आरोप ही त्यांनी केला. शेतकरी नेत्यांनी असेही सांगितले की, “ २६ जानेवारी रोजी योजनेनुसार ट्रॅक्टर रॅली काढली जाईल, आणि संघटनांनी पोलिसांनादेखील सांगितले आहे, या दरम्यान शांतता राखण्याची जबाबदारी आमची राहिल.”

 

नवीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणण आहे की, “हे कृषी कायदे त्यांच्या विरोधात आहेत.” बैठकीनंतर शेतकरी नेते म्हणाले की, बैठक पाच तास चालली असली तरी केवळ ३० मिनिटे सरकार आणि शेतकरी समोरासमोर बसले. बैठकीच्या सुरूवातीला बुधवारी झालेल्या बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात सरकारने केलेला प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी सरकारला दिली. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्यास सांगितले. लंच ब्रेक दरम्यान ४१ शेतकरी नेत्यांनी गटा गटात चर्चा केली,  तर तीन केंद्रीय मंत्री विज्ञान भवनात एका स्वतंत्र खोलीत थांबले होते.

 

कृषिमंत्र्यांनी शेतकरी संघटनांना सांगितले की, शेतकऱ्यांना शक्य तितके सर्व पर्याय देण्यात आले आहेत. कायदे स्थगित ठेवण्याच्या प्रस्तावावर त्यांनी परस्परांशी चर्चा करावी. ११ वी बैठकही अपयशी ठरल्याबद्दल कृषिमंत्री तोमर यांनी नाराजी  व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी कडक पावित्रा घेतला.  “बाहेरील काही संघटना आहेत, ज्या त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय हित राखण्यासाठी हे आंदोलन सुरू ठेऊ इच्छित आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.


Tags: Farmer Delhi ProtestFarmer protest 2020किसान हमी दर
Previous Post

राजपथावर प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची ‘वारकरी संतपरंपरा’

Next Post

स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची हॉक-I मधून यशस्वी चाचणी

Next Post
HAWK

स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची हॉक-I मधून यशस्वी चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!