Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार

March 11, 2021
in सरकारी बातम्या
0
kolhapur nagarparishad

 

 

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त या जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे 30 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि 17 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे 20 लाख रुपये, 17 लाख रुपये आणि 15 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यशवंत पंचायत राज अभियान सन 2020-21 (मुल्यांकन वर्ष 2019-20) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी 12 मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.

मंत्री  मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” पुरस्कार देण्यात येतात. ग्रामपंचायतींसाठी स्मार्ट ग्राम व्हिलेज योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायत राज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रिय पडताळणी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

विभागस्तरीय पुरस्कारांचीही घोषणा

मंत्री मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांचीही घोषणा केली. याअंतर्गत कोकण विभागात कुडाळ (जि. सिंधुदूर्ग), मालवण (जि. सिंधुदूर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड), नाशिक विभागात राहाता (जि. अहमदनगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक), पुणे विभागात कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर), औरंगाबाद विभागात लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरुर अनंतपाळ (जि. लातूर), अमरावती विभागात अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ) तर नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार पटकावले. या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे 11 लाख रुपये, 8 लाख रुपये आणि 6 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

या अभियानांतर्गत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना एकुण 2 कोटी 69 लाख रुपये इतक्या रकमेचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी पुरस्कार विजेत्या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. चालू वर्षातही राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांनी यशवंत पंचायत राज अभियानात चांगली कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.


Tags: muktpeethRural Development Minister Hasan MushrifsportscompetitonYashwantrao chavanक्रीडास्पर्धाग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफमुक्तपीठयशवंतराव चव्हाण
Previous Post

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी रस्त्यावर, सोशल मीडियावर संताप

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सततच्या भांडणांना कंटाळून पतीनं पत्नीची चाकूनं भोसकून हत्या केलीय, तर पत्नीच्या हत्येनंतर पतीनंही आत्महत्या केलीय. 2)मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणात बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक केली आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. 3)ठाणे शहरामध्ये घरफोड्या, चोऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून दररोज नवे प्रकार समोर येत आहेत. मात्र, हे प्रकार रोखण्यामध्ये पोलिसांना अपयश येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांना अटक करून वाढत्या चोऱ्यांवर अंकुश आणण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. 4)मद्याची बाटली आणि रोकड लाच घेतल्याप्रकरणी आरे डेअरीच्या वरिष्ठ लिपिकाला अटक झालेली असतानाच, कारवाई टाळण्यासाठी दहा लाखांची मागणी करणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गणेश साळुंके असे या पोलिसाचे नाव असून तो मालवणी पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सततच्या भांडणांना कंटाळून पतीनं पत्नीची चाकूनं भोसकून हत्या केलीय, तर पत्नीच्या हत्येनंतर पतीनंही आत्महत्या केलीय. 2)मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणात बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक केली आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. 3)ठाणे शहरामध्ये घरफोड्या, चोऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून दररोज नवे प्रकार समोर येत आहेत. मात्र, हे प्रकार रोखण्यामध्ये पोलिसांना अपयश येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांना अटक करून वाढत्या चोऱ्यांवर अंकुश आणण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. 4)मद्याची बाटली आणि रोकड लाच घेतल्याप्रकरणी आरे डेअरीच्या वरिष्ठ लिपिकाला अटक झालेली असतानाच, कारवाई टाळण्यासाठी दहा लाखांची मागणी करणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गणेश साळुंके असे या पोलिसाचे नाव असून तो मालवणी पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!