Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी शक्तीपुढे ३२ वर्षांपूर्वीही केंद्र सरकार झुकले होते…नेते होते टिकैतच!

November 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
farmers won battle against central government under tikait leadership before 32 years

मुक्तपीठ टीम

अखेर मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकत तीन नवीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली, तो १९ नोव्हेंबर हा दिवस माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचा. त्यामुळे एक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. शेतकरी शक्तीपुढे झुकणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत. त्यांच्याआधी दिवंगत राजीव गांधी शेतकऱ्यांपुढे नममस्तक झाले होते. तो दिवस दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीचा होता. योगायोग असा की आता शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या राकेश टिकैत यांचे वडिल महेंद्रसिंह टिकैत यांनी ३२ वर्षांपूर्वीच्या त्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

 

३२ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी घडवला होता इतिहास!

  • ३१ ऑक्टोबर १९८८ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही शेतकऱ्यांपुढे नतमस्तक व्हावे लागले होते.
  • ३२ वर्षांपूर्वी राजीव गांधींनी शेतकऱ्यांना ३५ मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी बोट क्लबचे आंदोलन संपले होते.
  • विशेष म्हणजे त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व महेंद्रसिंग टिकैत करत होते.

३२ वर्षांनी पुन्हा शेतकरी जिंकले!

  • नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि पिकाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी यासाठी आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नव्हते.
  • पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी कित्येक दिवस दिल्ली सीमेवर उभे आहेत.
  • तसेच ३२ वर्षांपूर्वी दिल्लीच्या बोट क्लबवर हल्ला करून शेतकऱ्यांनी दिल्ली ठप्प केली होती.
  • जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला, तसाच त्यावेळी आपल्या मागण्यांसाठी शेतकरी उभे ठाकले होते.

काय घडले होते ३२ वर्षांपूर्वी?

  • ३२ वर्षांपूर्वी २५ ऑक्टोबर १९८८ रोजी शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियनचे लोक आपल्या मागण्या घेऊन दिल्लीतील बोट क्लबवर सभा घेणार होते.
  • वीज कपात, सिंचन दर आणि पिकांचे रास्त भाव यासह ३५ कलमी मागण्यांसाठी पश्चिम उत्तर प्रदेशातून शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीत येत होते, त्यांना दिल्लीच्या लोणी सीमेवर पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने रोखले.
  • शेतकरी थांबले नाहीत, लोणी सीमेवर पोलिसांनी गोळीबार केला आणि दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.
  • पोलिसांच्या गोळीबारात कुतबी येथील राजेंद्र सिंह आणि तितौली येथील भूप सिंह यांचा मृत्यू झाला.
  • असे असतानाही शेतकरी दिल्लीत पोहोचले होते.
  • दिल्लीच्या बोट क्लबपर्यंत पोहोचून देशातील १४ राज्यांतील ५ लाख शेतकऱ्यांनी दिल्ली पूर्णपणे ठप्प करून टाकली होती.
  • इंडिया गेट, विजय चौक, बोट क्लब येथेच शेतकरी दिसत होते.
  • शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर बोट क्लबवर उभ्या केल्या होत्या.

काँग्रेस मेळाव्याच्या व्यासपीठावरही शेतकऱ्यांचा ताबा!

  • त्या दिवसांत दिल्लीच्या बोट क्लबमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त (३१ ऑक्टोबर) होणाऱ्या मेळाव्यासाठी रंगरंगोटी आणि रंगकाम सुरू होते.
  • या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठही शेतकऱ्यांनी काबीज केले.
  • लुटियन्स परिसरात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ताबा मिळवला होता, त्यावरून मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत नाराज झाले होते.
  • महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यीय समितीने राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांची भेट घेतली, मात्र कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
  • शेतकऱ्यांना राजपथावरून हटवण्यासाठी पोलिसांनी ३० ऑक्टोबर १९८८ च्या रात्री शेतकऱ्यांवर लाठीमार केला होता.
  • आठवडाभराहून अधिक काळ शेतकऱ्यांनी राजपथ आपल्या ताब्यात ठेवला होता.
  • अखेर सरकारला शेतकऱ्यांपुढे नमते घ्यावे लागले.

 

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांची माघार

  • तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शेतकऱ्यांना ३५ मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी बोट क्लबचे आंदोलन संपले.
  • मात्र, शेतकरी रॅलीमुळे राजीव गांधींना त्यांच्या आई इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या रॅलीचे ठिकाण बदलावे लागले.
  • बोट क्लबऐवजी लाल किल्ल्यामागील मैदानावर रॅली काढावी लागली.

Tags: Farmer protestModi govtPM Narendra modiRajiv Gandhiपंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीपंतप्रधान नरेंद्र मोदीमोदी सरकारराजीव गांधी
Previous Post

मुंबई मनपाच्या शाळा देशातील टॉप टेनमध्ये! आदित्य ठाकरेंकडून कौतुक!!

Next Post

न्यायालयीन सुनावणीदरम्यान पक्षकार बनियानमध्ये…दहा हजार रुपयांचा दंड!

Next Post
delhi high court

न्यायालयीन सुनावणीदरम्यान पक्षकार बनियानमध्ये...दहा हजार रुपयांचा दंड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!