Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#शेतकरीआंदोलन आज ५१ वा दिवस, दिल्लीत शेतकरी – सरकार चर्चा सुरु

January 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
farmer protest

मुक्तपीठ टीम

 

शेतकरी आंदोलनाचा आज ५१ वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात आज दहाव्या फेरीची चर्चा सुरु झाली आहे. शेतकरी आणि सरकारमधील ही शेवटची बैठक असू शकते. शेतकरी नेते विज्ञान भवनात पोहोचले आहेत.
शेतकरी नेत्यांनी सरकारकडून आजही अपेक्षा असल्याचे स्पष्ट केलं. पण त्या अपेक्षा पूर्ण करणं सरकारच्या हातीच असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. आम्हाला सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत एवढेच हवे आहे. तसेच आमच्या पिकांना किमान हमी दराची कायदेशीर हमी मिळावी, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

 

१२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांसह कृषी कायद्याविषयी चर्चा करण्याच्या हेतूने ४ तज्ज्ञांची समिती गठीत केली होती. १४ जानेवारी रोजी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी त्यांचे नाव समितीमधून मागे घेतले.

संसदेत कृषी कायदे झाले आहेत आणि हे कायदे कोर्टाद्वारे रद्द करता येणार नाहीत, हे सरकारला माहित आहे, असेही शेतकरी नेते म्हणाले. त्यामुळे २८ डिसेंबरपासून जे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत, केंद्राने त्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. समितीची स्थापना करणे हा यावर तोडगा नाही, असंही त्यांचे म्हणणे आहे.

 

कृषि कायदे मागे घेण्यासाठी काँग्रेसही आग्रही

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाशिवाय आम्हाला इतर काहीही मंजूर नाही. केंद्र सरकारला वास्तव माहित नाही.
पंजाब मंत्रिमंडळाने केंद्राकडे शेतकऱ्यांना किमान हमी दराचा घटनात्मक हक्क देण्याची मागणी केली आहे.
गुरुवारी झालेल्या पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनात झालेल्या शेतकर्‍यांच्या मृत्यूबद्दल दोन मिनिटे मौन पाळले गेले. या आंदोलनात आतापर्यंत सुमारे ७८ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.

नवीन कायदे शेती सुधारणांचा मार्ग मोकळा करतीलः

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतातील नवीन शेतकरी कायदे हे सुधारणांचा एक नवीन मार्ग आहेत असे वर्णन करत आहे. आयएमएफच्या कम्युनिकेशन्स डायरेक्टर गेरी राईस यांच्या म्हणण्यानुसार भारताचे हे नवीन कायदे शेतकर्‍यांना खूप उपयुक्त ठरतील. शेतकरी कोणत्याही मध्यस्थांची मदत न घेता थेट विक्रेत्यांशी संपर्क साधू शकतील. यामुळे खेड्यांची प्रगती होईल.

टिकैत अमर जवान ज्योती वर तिरंगा फडकवणार

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी गुरुवारी सांगितले होते की,’२६ जानेवारी रोजी आम्ही लाल किल्ला ते इंडिया गेट पर्यंत रैली काढणार आहोत. यानंतर सर्व शेतकरी अमर जवान ज्योतीवर जमून तेथे तिरंगा फडकवतील. ही ऐतिहासिक घटना असेल जेथे एकीकडे शेतकरी असतील तर दुसऱ्या बाजूला जवान असतील.’


Tags: FarmerFarmer Delhi Protestfarmer lawFarmer protestprotestकृषि कायदेशेतकरी
Previous Post

केबीसीमध्ये जिंकलेल्या ५० लाखांसाठी महिलेचा छळ

Next Post

५२ लाख रुपयांचा ३४५ किलो गांजाचा साठा जप्त

Next Post
sakinaka gaanja photo

५२ लाख रुपयांचा ३४५ किलो गांजाचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!