Thursday, May 15, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान द्यावा”

मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीची मागणी

September 15, 2021
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीची मागणी

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडी सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घेतली आहे. आता स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानापासून वंचित राहिलेल्या मराठवाड्यातील जुलमी निजामी राजवटी विरोधात उठाव केलेल्या योध्दयांचा प्रलंबित प्रश्नही सोडवावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीने केली आहे. येत्या शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राज्यभरात साजरा होणार आहे. त्या निमित्ताने स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ जी के डोंगरगावकर यांनी एका निवेदनाद्वारे  मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील जनतेच्या  मागण्या सादर केल्या आहेत.

 

निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याची मागणी १९८० सालातच महाराष्ट्र सरकारने मान्य केली आहे. पण निजामाच्या शरणागतीनंतरही त्याचे खासगी सैन्य असलेले रझाकार आणि त्या राजवटीची चाकरी करणारे जहागीरदार, पटवारी, दिवाण हे मोठ्या संख्येने मराठवाड्यात कायम होते. ते आपल्यावर सूड उगवतील या भीतीने त्या काळात बऱ्याच योद्धयांनी आपली ओळख लपवली . तसेच अनेक योद्धयांनी मूळ गावे सोडून अन्यत्र स्थलांतर केले. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या दर्जापासून वंचित राहावे लागले असून त्यांचा प्रश्न आजवर प्रलंबित राहिलाआहे, असे डॉ डोंगरगावकर यांनी सांगितले.

 

दुष्काळाचा शाप असलेल्या मराठवाड्यातून १९७२ पासून रोजी रोटीसाठी स्थलांतरित झालेले लोक मुंबई आणि ठाणे,पालघर, रायगड या जिल्ह्यांत मोठया प्रमाणात झोपडीवासीय आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ते रहिवासी फोटोपास आणि नागरी सोयी सुविधांपासून आजही वंचित आहेत. राज्य सरकारने त्यांना म्हाडा- सिडकोमार्फत परवडणारी घरे द्यावीत, अशीही मागणी मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीने केली आहे.

 

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या त्या क्षेत्रात मुंबई- ठाण्यासह ९ महानगर पालिका, ठाणे,पालघर, रायगड या तीन जिल्यातील ९ नगर परिषदा आणि खालापूर या नगर पंचायतीचा समावेश आहे. विधानसभेच्या तब्बल ६५ जागा त्या पट्ट्यात आहेत, याकडे समितीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

 

स्मारक समितीच्या मागण्या

  • मराठवाड्यात मॅट्रिकनंतरच्या शिक्षणाचे माध्यम सक्तीने इंग्रजी करण्यात यावे.
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे खुल्या अर्थ व्यवस्थेची आव्हाने पेलणारे मनुष्यबळ घडवणारे नवे व्यावसायिक अभ्यासक्रम लागू करावेत.
  • इंग्रजीसह विदेशी भाषांचा अनुवाद करण्याचे प्रशिक्षण/ प्रकाशन केंद्र स्थापन करावे.
  • अजिंठा लेणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन- प्रशिक्षण संस्थेला आणि पाली भाषा विद्यापीठाला मान्यता द्यावी
    या मागण्यांचा स्मारक समितीच्या निवेदनात समावेश आहे.

 

स्वातंत्र्य सैनिकांच्या  शिक्षणसंस्थेला पाच एकर जागा द्या: डॉ. डोंगरगावकर

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी चार दशके चालवलेल्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळ या एकमेव शिक्षण संस्थेला सिडको- म्हाडाद्वारे विशेष बाब म्हणून नवी मुंबईत पाच एकर जागा देण्यात यावी. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटींचे अनुदान देण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रा डॉ जी के  डोंगरगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ही संस्था गेली २० वर्षे रायगड जिल्ह्यात कार्यरत असून संस्थेचे नवी मुंबईतील सत्याग्रह कॉलेज हे नामांकित आहे, असे त्यांनी सांगितले.


Tags: anti nijam fightersCMO MaharashtraMaharashtramuktpeethनिजामविरोधी लढामराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीमुक्तपीठमुख्यमंत्री उद्धव ठाकरेस्वातंत्र्य सैनिक
Previous Post

इलेक्ट्रिक वाहन धोरण, कोरोना रोखण्यात महाराष्ट्राच्या कामगिरीचे नीती आयोगाकडून कौतुक

Next Post

राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जाणार

Next Post
मुंबई विद्यापीठ

राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!