Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

October 4, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maha CM

मुक्तपीठ टीम

शालेय शिक्षण विभागामार्फत राबविले जाणारे “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाचा शुभारंभ  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंग तसेच  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुहास प्रभू उपस्थित होते.

“माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या  उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी केले. प्रास्ताविकेमधून त्यांनी मागच्या दीड वर्षात जेव्हा शाळा बंद ठेवाव्या लागल्या  तेव्हा ज्या विविध माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आले त्याबद्दल थोडक्यात माहिती देवून आता विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांच्या संपादणूक  वृद्धीसाठी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी”या अभियाना अंतर्गत केलेल्या सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याबद्दलची संकल्पना स्पष्ट केली.  या प्रसंगी  मुलांनो शाळेकडे चला  असा संदेश देणारी “चला मुलांनो चला” हि सुंदर चित्रफित  प्रदर्शित करण्यात आली .

 

या प्रसंगी उपस्थित असणारे  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडचा धोका काही अंशी कमी झाल्याने देशाचे अर्थचक्र जसे सुरु असायला हवे तसेच शिक्षण घेण्याचा हक्क असणाऱ्या मुलांच्या शाळा सुरु करण्याची ही योग्य वेळ आहे. अशा उचित वेळी निर्णय घेतल्याबद्दल त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन केले.सतत घरी  राहिल्यामुळे  मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या भावनिक, मानसिक समस्यांवर परिणामकारक उपाय म्हणजे शाळा सुरु करणे. त्यासाठी  टास्क फोर्सने तयार केलेल्या SOP प्रत्येक शाळेपर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत. त्याचे शाळांनी आणि समाजातील प्रत्येक घटकांनी पालन करून “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गेल्या दीड वर्षात  शाळा बंद असतांना ऑनलाईन व ऑफ लाईन पद्धतीने मुलांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून शालेय शिक्षण विभागाने केलेले विविध उपक्रम प्रथम एक चित्रफितीच्या  माध्यमातून  प्रदर्शित केले. त्यांनी या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले की गेल्या दीड वर्षात शाळा सुरु करण्याबाबत,मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांनी अनेकदा सभा घेवून मार्गदर्शन केले त्यामुळेच आज शाळा सुरु करण्याचा निर्णय आपण घेवू शकत आहे. आज  ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहे. टास्क फोर्स ने दिलेल्या मार्गदर्शक सुचानाचे पालन करून मुलांचे शिक्षण शाळेंमधूनच निरंतर सुरु राहावे या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी सर्वाना केले. मुख्यमंत्री साहेबांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना प्रमाणेच माझे विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान यशस्वी करू असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
या प्रसंगी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर  विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सातत्यपूर्ण आराखडा कसा असेल याबाबत चित्रफितीच्या  माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.
आपल्या उद्घाटनीय भाषणांत बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळेची घंटा, शाळेचा पहिला दिवस, नवी पुस्तके, नवा गणवेश आणि नवीन शिक्षकांना भेटण्याची उत्सुकता या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मते सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काळ आता सुरु झाला आहे. इतके महिने घरात बंद असलेले विद्यार्थी आता नव्या जोमाने, नव्या उमेदीने पुनश्च एकदा शाळेत येतील तेव्हा त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेत या मुलांना घडविण्याचा व घडण्याचा काळ आता सुरु होत आहे. शाळा हे भविष्याचे प्रवेशद्वार आहे. असे म्हणत त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासोबत शाळा व्यवस्थापन समिती,पालक व समाजातील सर्व घटकांना आव्हान केले की देशाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर माझे विद्यार्थी माझी जबाबदारी हे  अभियान सर्वांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी टास्क फोर्सने  स्वच्छे संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोरोनाने शिकविलेले आरोग्यदायी जीवन आपली जबाबदारी हे  लक्षात ठेवूया आणि भविष्याचे आधारस्तंभ असलेल्या मुलांसाठी एकत्रित राहून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आभारप्रदर्शन करून केली या प्रसंगी ते बोलत असतांना म्हणाले की सदर कार्यक्रमा मध्ये राज्यातील सर्व शिक्षण यंत्रणेसोबत अनेक पालक सुद्धा सहभागी झाले आहेत.  याप्रसंगी त्यांनी सर्वाना आवाहन केले की विद्यार्थ्याचे मागील दीड वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची ही आपल्याला योग्य वेळी मिळालेली संधी आहे. या संधीचा आपण उपयोग करीत मुलांना पुन्हा शाळेकडे वळवूया. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.


Tags: chief minister uddhav thackerayEducation Minister Varsha Gaikwadmy student my responsibilityमाझे विद्यार्थी माझी जबाबदारीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत काही ठिकाणी ६ आणि ७ ऑक्टोबरला पाणी नसणार,!

Next Post

“योगींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा!”

Next Post
BJP

"योगींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!