Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाकडून काँग्रेस लक्ष्य, हाताला किती हिस्सा? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करण्याचीही मागणी

March 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
fadanvis & thackeray

मुक्तपीठ टीम

“गेल्या काही दिवसात राज्यात ज्या घटना समोर येतात, त्या अत्यंत चिंताजनक आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. भाजपाच्या शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरेंकडून बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घ्यावी. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, ही मागणी राज्यपाल-सरकार संघर्षाची नांदी ठरणार असल्याची शक्यता आहे.

या भेटीनंतर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप करतानाच फडणवीसांनी आज काँग्रेसलाही लक्ष्य केले. ते म्हणाले, “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलत आहेत. इथले नेते वेगळे बोलत आहेत. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही. काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे?”

या भेटीदरम्यान राज्यातील सध्याच्या घडामोडींची गंभीर दखल घेत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्याला वाचवणं गरजेचं आहे त्यामुळेच राज्यपालांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी विनंती आम्ही केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

फोन टॅपिंग प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा लक्ष्यवेध

• गेल्या काही आठवड्यांपासून राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक
• “मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट.
• मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे.
• शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला.
• “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे.
• दिल्लीतील नेते वेगळे बोलत आहेत.
• इथले नेते वेगळे बोलत आहेत.
• केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही.
• काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे?
• मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे.

बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, ही आमची मागणी असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही भाजपा नेत्यांनी सांगितले आहे.


Tags: chief minister uddhav thackeraydevendra fadnavisgovernor bhagat singh koshyariMVAमहाविकास आघाडी सरकारराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

“वैद्यकीय शिक्षण विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच” – अमित देशमुख

Next Post

गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा

Next Post
Rajendra sharma

गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!