Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन घाट रस्त्यांकडे सरकारचे लक्ष

सर्वेक्षणासह अंदाजपत्रक तयार करा-सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

January 8, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ashok Chavan Instructions for Ratnagiri-kolhapur ghat road

मुक्तपीठ टीम

रत्नागिरी जिल्ह्यात दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी या  तीन घाट रस्त्यांच्या कामांचे प्राथमिक सर्वेक्षण करावे आणि त्याचे  अंदाजपत्रक, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकरत्नागिरी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-कोळेवाडी-मांजरे-गावडी जि. कोल्हापूर, संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे ते विशालगड (जि. कोल्हापूर), राजापूर तालुक्यातील मौजे काजिर्डा ते पडसाळी घाट या तीन घाट रस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्गासाठी  भांबेड ते गावडी या घाट रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. 

            

भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी हे रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारे पर्यायी रस्ते आहेत, या घाट रस्त्यांच्या सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी तसेच सविस्तर प्रकल्प अहवालासाठी येत्या अर्थंसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे निर्देश देतानाच या तीनही घाट रस्त्यांच्या कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देशही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून तो खुला करण्याची मागणी यावेळी रत्नागिरी जयगड पोर्ट ट्रान्सपोर्टस युनियनच्या वतीने अध्यक्ष रमेश कीर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे यावेळी केली.

            

राजापूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेचे सर्वेक्षण करुन आवश्यक जागेची मागणी जिल्हा परिषदेकडून प्राप्त करुन घ्यावी. आणि त्यानुसार नवीन जागा पंचायत समिती इमारतीसाठी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही अशोक चव्हाण यांनी दिल्या.

  

डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी १.५६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता           

रत्नागिरी जिल्ह्यातील जाकिमिऱ्या येथील कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी शासनाने १ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून या स्मारकाचे उर्वरित काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

            

जाकिमिऱ्या (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            

डॉ.बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकातील बहुउद्देशीय सभागृह आणि वाचनालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या स्मारकातील सुशोभिकरण, संरक्षक भिंत, डॉ. बाळासाहेब सावंत यांचे स्मृती शिल्प आणि विद्युतीकरणाचे काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. स्मारकाची इमारत अद्ययावत राहण्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्तीकरिता ही इमारत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ती परवानगी देण्यात येणार असल्याचेही मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


Tags: Ashok ChavanKolhapurratnagiriअशोक चव्हाणकोल्हापूररत्नागिरी
Previous Post

“नानाजींनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले”

Next Post

इसिससाठी काम करण्यासाठी मुस्लिम तरुणांना चिथावणाऱ्यांना मुंबईत आठ वर्षांची शिक्षा

Next Post
ISIS

इसिससाठी काम करण्यासाठी मुस्लिम तरुणांना चिथावणाऱ्यांना मुंबईत आठ वर्षांची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!