Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा आरोप

March 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
ashish-shelar

मुक्तपीठ टीम

 

मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय? असा सवाल करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी बांद्रा येथील प्रकरण सभागृहात उघड केले.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी २१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीसाठी विविध तरतुदी दिसतात मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी तरतुदी का नाही? असा खोचक सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी कला नगर पुलाचे लोकार्पण करताना मुंबईचा सुनियोजित विकास झाला पाहिजे असे विधान केले. गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना आताच सुनियोजित विकासाची आठवण का व्हावी? असा उपरोधिक टोला ही आमदार अँड. शेलार यांनी लगावला.

एकिकडे पर्यावरण मंत्री सांगतात की, मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण असायला हवे. जर महापालिकेचे अधिकार अबाधित राहून असे प्राधिकरण होणार असेल तर आमचा विरोध नाही. पण एकिकडे असे सांगितले जात असले तरी मंत्रालयातून कृती मात्र उलटी केली जाते. पाली हिल येथील कृष्णा-अजय डेव्हलपर्सने यांच्या इमारतीचे बांधकाम करताना फनेल झोनच्या नियमापेक्षा १० फूट जास्त उंच करण्यात आले. त्याला एअरपोर्ट अँथाँरिटीने विरोध केला त्यामुळे मुंबई महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र नाकारले. मात्र याबाबत मंत्रालयात नगर विकास विभागाने सुनावणी घेऊन त्या विकासकाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. अशा प्रकारे महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या इमारतींंना आता बांधकाम परवाने आणि भोगवटा प्रमाणपत्रे पण मंत्रालयातून देणार का? महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणार का? जी तातडी कृष्णा- अजय डेव्हलपर्सच्या कामात दाखली ती फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासा बाबत का दाखवत नाही? हाच का तो तुमचा सुनियोजित विकास? असा सवाल आमदार शेलार यांनी केला.

५०० चौरस मिटर पेक्षा छोट्या भूखंडावरील इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणारे धोरण मुंबई महापालिकेने मंजूर केले. त्यातून काही सवलती देण्यात आल्या ही बाब अत्यंत चांगली आहे. पण एकदा धोरण महापालिकेच्या सुधार समितीने मंजूर केल्यानंतर पुनर्विकासाचे प्रत्येक प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीत आणायची अट का घातली? हीतर टोल वसूली आहे. मुंबईत अशा २५ हजार इमारती आहेत म्हणजे धोरण मंजूर करताना कोणी “भेटले” नाही म्हणून प्रत्येक प्रस्ताव सुधार समितीत आणायची अट घातली का? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.

वांद्रे वरळी सिलिंक मुळे बाधित होणाऱ्या वांद्रे, खार, जूहू वर्सोवा येथील कोळी बांधवांच्या नुकसान भरपाईचे काय? वांद्रे चिंबई येथे जेट्टी उभारली जात असून त्याला स्थानिक कोळी बांधवाचा विरोध आहे मग सरकार ही जेट्टी कुणासाठी बांधतेय?

 

पुरवणी मागण्यांमध्ये सरकारने ईव्हीएम मशिनसाठी २.५ कोटींची तरतूद केली आहे त्यामुळे यापुढे काँग्रेस ईव्हीएम मशिन विरोधात बोलणार नाही असा टोला त्यांनी लगावला. तर समृद्धी महामार्गात जागा गेलेल्या शहापूरच्या ८५ वर्षीय सावित्रीबाई कदम यांना दोन वर्षे मोबदला मिळाला नाही तो तातडीने मिळावा अशी मागणी करीत याकडे सरकारचे लक्ष वेधले.


Tags: ashish shelarBJPmumbaiअँड आशिष शेलारपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई महापालिका
Previous Post

३७० कोटींच्या करचोरीप्रकरणी अनुराग कश्यप, तापसी पन्नूची चौकशी! बॉलिवूड महाघोटाळा की राजकारण?

Next Post

गुन्हे महत्त्वाचे : 1) मुंबईच्या किनारपट्ट्यांवरील तस्करीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. मुंबईत छुप्या मार्गाने येणारे अमली पदार्थ असोत वा करचोरी करुन येणाऱ्या वस्तू, त्या प्रामुख्याने न्हावा-शेवा किंवा अन्य बंदरातून आणल्या जात आहेत. यामुळे महसुल गुप्तचर संचालनालयाने किनारपट्ट्यांवर मोठी मोर्चेबांधणी केली आहे. 2) मुंबईमध्ये दोन दिवसांत तब्बल ८३ कोटी रुपयांची जीएसटी करचोरी उघड झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळांच्या टीमनेकेंद्रीय जीएसटीअंतर्गत टाकलेल्या छाप्यात ही करचोरी समोर आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने मुकेश अहुजा नावाच्या व्यापाऱ्याला या प्रकरणात अटक केली. 3) ३ लाखांमध्ये १ हजार ४४० अमेरिकन डॉलर देतो असे सांगून भामट्यांने डॉलरऐवजी वृत्तपत्राचे कागद देऊन भाईंदरमधील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून भामट्यांचा शोध सुरू आहे. 4)भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने कोपरी गावातील एका वृद्धेच्या हाताला व नाकातोंडाला चाकूच्या धाक दाखवून चिकटपट्टी लावून तिच्या अंगावरील सुमारे ४ लाखांचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पकडण्यात यश मिळाले आहे.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे : 1) मुंबईच्या किनारपट्ट्यांवरील तस्करीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. मुंबईत छुप्या मार्गाने येणारे अमली पदार्थ असोत वा करचोरी करुन येणाऱ्या वस्तू, त्या प्रामुख्याने न्हावा-शेवा किंवा अन्य बंदरातून आणल्या जात आहेत. यामुळे महसुल गुप्तचर संचालनालयाने किनारपट्ट्यांवर मोठी मोर्चेबांधणी केली आहे. 2) मुंबईमध्ये दोन दिवसांत तब्बल ८३ कोटी रुपयांची जीएसटी करचोरी उघड झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळांच्या टीमनेकेंद्रीय जीएसटीअंतर्गत टाकलेल्या छाप्यात ही करचोरी समोर आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने मुकेश अहुजा नावाच्या व्यापाऱ्याला या प्रकरणात अटक केली. 3) ३ लाखांमध्ये १ हजार ४४० अमेरिकन डॉलर देतो असे सांगून भामट्यांने डॉलरऐवजी वृत्तपत्राचे कागद देऊन भाईंदरमधील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून भामट्यांचा शोध सुरू आहे. 4)भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने कोपरी गावातील एका वृद्धेच्या हाताला व नाकातोंडाला चाकूच्या धाक दाखवून चिकटपट्टी लावून तिच्या अंगावरील सुमारे ४ लाखांचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पकडण्यात यश मिळाले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!