मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणात आता अमृता फडणवीसांनी देखील सरकारवकर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सरकावर टीका केली आहे.
अमृता फणवीस यांनी नाव न घेता एक ट्विट केलं आहे की, “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” असं ट्विट त्यांनी केलंय. यात कुणाच्या नावाचा उल्लेख नसला तरी त्यांनी हॅशटॅगमध्ये ‘सचिन वाझे’ आणि ‘टार्गेट १०० कोटी’असं म्हंटलंय. यावरून सरकारवर त्यांचा रोख असल्याचं लक्षात येतंय.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021








Subscribe