मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे न्यूज चॅनल्सनी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. लखीमपूर शेतकरी हत्याकांडामुळे देशभर माजलेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर जिथं ते घडलं तिथं त्याचे काय पडसाद उमटतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एबीपी-सीव्होटरने केलेले सर्वेक्षण महत्वाचे आहे. या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशची जनता तेथे उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना जबाबदार मानत आहेत. तसेच त्यामुळे भाजपाचे नुकसान होईल असेही सांगत आहेत. मात्र, तरीही सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री पदासाठी मतदारांची सर्वाधिक पसंती ही विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच आहे. तर सत्तेसाठी आवश्यक लोकप्रियतेतही भाजपाच नंबर एकवर आहे.
काय सांगतं एबीपी-सी-व्होटरचा उत्तर प्रदेश सर्वेक्षण
कुणाला किती मते?
- भाजपला 41 टक्के
- समाजवादी पक्षाला 32 टक्के
- बहुजन समाज पार्टीला 15 टक्के
- काँग्रेसला 6 टक्के
- इतरांना 6 टक्के मते मिळू शकतात
मतदारांची पसंती…तेव्हा आणि आता!
दल 2017 सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021
भाजपा 41.4 41.8 41.3
सपा 23.6 30.2 32.4
बसपा 22.2 15.7 14.7
काँग्रेस 6.3 5.1 5.6
इतर 6.5 7.2 6.0
लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड
- पहिला प्रश्न असा होता की केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे लखीमपूरमध्ये हिंसा भडकली का?
होय – 61 टक्के
नाही – 39 टक्के
- लखीमपूर शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाचे नुकसान झाले आहे का?
होय – 70 टक्के
नाही – 30 टक्के
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री कोण असावा?
- योगी आदित्यनाथ – 41 टक्के
- अखिलेश यादव – 31 टक्के
- मायावती – 17 टक्के
- प्रियांका गांधी – 4 टक्के
- जयंत चौधरी – 2 टक्के
- इतर – 5 टक्के