Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदींच्या उदयानंतर कसा बदलत गेला देशाचा राजकीय नकाशा?

December 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

काल गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला आपली सत्ता वाचवण्यात यश आले. तर, हिमाचलमध्ये कॉंग्रेसने बाजी मारली. यावेळी भाजपने मोठा विक्रम केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, पण हिमाचलमध्ये भाजप प्रथा बदलू शकला नाही आणि सत्तेतून बाहेर पडला. पाच महिन्यांत भाजपच्या हातातून सत्ता गेल्याचे हे दुसरे राज्य आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशाच्या राजकीय नकाशात बराचसा बदल झाला आहे.

आता देशातील १६ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. देशातील सुमारे ४९.३ टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. त्याचबरोबर काँग्रेसचे आता सहा राज्यांमध्ये वर्चस्व असेल. हिमाचलच्या शपथविधीनंतर तीन राज्यात काँग्रेसचे सरकार असेल. त्याच वेळी, काँग्रेस इतर तीन राज्यांमध्ये आघाडीचा भाग आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी २६ टक्के लोक या राज्यांमध्ये राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सत्तेत आल्यानंतर देशात किती राज्यात भाजपचे सरकार होते?

  • मोदी सत्तेवर आले तेव्हा सात राज्यात भाजपचे सरकार होते.
  • मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले.
  • मोदी सत्तेवर आले तेव्हा देशातील सात राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
  • त्यापैकी पाच राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री होते.
  • त्याच वेळी, त्यांचा मित्र पक्ष आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये सरकार चालवत होता. देशातील सहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या दोन राज्यांमध्ये राहत होती.
  • उर्वरित पाच राज्य छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते.
  • देशातील १९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या राज्यांमध्ये राहत होती. म्हणजेच मोदी सत्तेवर आले तेव्हा जवळपास २६ टक्के लोकसंख्येवर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सरकार चालवत होते.

२०१८मध्ये भाजपने शिखर गाठले…

  • २०१४मध्ये सात राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
  • चार वर्षांनंतर, मार्च २०१८मध्ये, २१ राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
  • देशातील सुमारे ७१ टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्येच्या बाबतीत भाजपची सत्ता शिखरावर होती.
  • त्याचवेळी चार राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या राज्यांमध्ये सात टक्के लोकसंख्या राहत होती.

Tags: BJPIndiamuktpeethPolitical PowerPolitical Structureprime minister narendra modiघडलं-बिघडलंपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपभारतमुक्तपीठराजकीय आराखडाराजकीय सत्ता
Previous Post

नागपूर अधिवेशनात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

Next Post

राज ठाकरेंना अयोध्येत जाण्यापासून रोखणाऱ्या बृजभूषणांविरोधात मनसेचा संयम का? जाणून घ्या कारणं…

Next Post
Raj Thackeray And Brijbhushan Singh

राज ठाकरेंना अयोध्येत जाण्यापासून रोखणाऱ्या बृजभूषणांविरोधात मनसेचा संयम का? जाणून घ्या कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!