Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

प्रवासात आला ह्रदयविकाराचा झटका…कसा कराल बचाव?

September 24, 2022
in featured, आरोग्य
0
heart attack while traveling

मुक्तपीठ टीम

अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे.

विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत हृदयरुग्णांच्या संख्येत आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. साधारणपणे ४० वर्षांवरील व्यक्तींना हृदय, मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारखे आजार आहेत. त्यांना हृदयाशी संबंधित आजार अधिक प्रमाणात होत आहेत. मात्र, आता तरूणांना हृदयविकारही होत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे लोक अगदी लहान वयात मरण पावत आहेत. अशा परिस्थितीत हृदयरोगी असल्यास काही खबरदारी आणि काही आवश्यक उपकरणे आणि औषधेसोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

प्रवासात आला ह्रदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?

  • प्रत्येक व्यक्तीच्या कारमध्ये काही आवश्यक औषधे आणि प्रथमोपचार सुविधा असणे आवश्यक आहे.
  • अपघात कधीही कुठेही होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक उपकरणे व काही औषधे सोबत ठेवली तर येणाऱ्या धोक्यातून काही प्रमाणात आपण बाहेर पडू शकतो.
  • वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता लोकांनी त्यांच्या कारमध्ये फर्स्ट एड बॉक्ससह बँड एड, अँटी जर्म मलम ठेवावेत.
  • याशिवाय बर्न क्रीम, गॉज पॅड, जुलाबासाठी काही औषधे, अँटासिड्स किंवा अॅसिडिटीची औषधे, पॅरासिटामॉलसारखी काही वेदना औषधे घेणे चांगले आहे.
  • हँड सॅनिटायझर आणि अँटीसेप्टिक सर्व वाहनांमध्ये असावेत.
  • काही जीव वाचवणारे तंत्र सर्वांना माहीत असायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेणेकरून वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी त्याचा वापर करता येईल.
  • प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
  • कोणताही अपघात झाल्यास तपास, वैद्यकीय मदत आणि प्रथमोपचार खूप उपयुक्त ठरतात.
  • कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य बिघडलं की कंपन्यांचंही आर्थिक आरोग्य बिघडतं!सर्वेक्षणाचा निष्कर्ष!!

गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोना काळात अशा प्रकरणांमध्ये आणखी वाढ झाली आहे. यात १५ टक्के भारताचा वाटा आहे. भारतीय कर्मचार्‍यांच्या मानसिक आरोग्याच्या सद्य स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि निरोगीपणाचे सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणातून असे आढळले की, सुमारे ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य बिघडण्यामागे त्यांच्या ऑफिसशी संबंधित तणाव हे प्रमुख कारण आहे. याशिवाय कोरोनाशी संबंधित आर्थिक आव्हानेही या सगळ्यासाठी जबाबदार मानली जातात.

ऑफिसमधील तणावामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम…

  • अनेक समस्यांमुळे लोक तणावाखाली असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होतो.
  • यामध्ये सामाजिक आणि आर्थिक खर्चही गुंतलेला आहे.
  • अहवालात असेही आढळून आले आहे की भारतीय कर्मचार्‍यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो, ज्यामुळे ते कार्यालयात गैरहजर राहतात आणि कमी उत्पादकता आणि नोकरी सोडल्यामुळे भारतीय कर्मचार्‍यांवर भार पडतो.

खराब वातावरणात काम केल्याने तणाव वाढतो

  • आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण खराब वातावरणात काम करणे आणि त्या वातावरणाशी जुळवून घेऊ न शकल्याने ताणतणाव वाढ होते.
  • सर्वेक्षणानुसार, गेल्या एका वर्षात ८० टक्के भारतीय कर्मचार्‍यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल नोंदवले आहे.
  • कर्मचार्‍यांना टेन्शन फ्री वातावरण मिळावे, त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळावे, असे वातावरण कार्यालयात निर्माण करण्याची गरज आहे असे सर्वेक्षणात स्पष्ट झाले.

Tags: 9healthheart attackheart attack while travelingmuktpeethआरोग्यप्रवासात ह्रदयविकार झटकामुक्तपीठह्रदयविकार झटका
Previous Post

मधुमेह म्हणजे काय आणि तो का होतो? जाणून घ्या या आजाराचा शरीरावर कसा परिणाम होतो…

Next Post

राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वच भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता!

Next Post
Union Education Minister Dharmendra Pradhan

राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वच भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!