Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुरुषांच्या व्यसनांमुळे महिलांचा घात! सरकारच्या व्यसन वर्धक नीतीला विरोधाचे महिला लोकप्रतिनिधींना आवाहन!!

व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचने केले आवाहन

March 8, 2022
in घडलं-बिघडलं
1
Addiction

मुक्तपीठ टीम

व्यसन हा आजार आहे, असे जागतिक आरोग्य संघटना बजावत आहे. परंतु विविध व्यसनवर्धक नितीचा स्वीकार करणारे, समाज घातकी निर्णय घेऊन महाराष्ट्राचे सरकार हा आजार पसरवण्याचा अतिरेकी उत्साह का दाखवत आहे. या व्यसन वर्धक नीतीला प्रखर विरोध राज्यातील महिला लोकप्रतिनिधींनी करावा, व्यसनाचा आजार पसरवण्याचे काम थांबवावे, असे आवाहन व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधींना करण्यात आले आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व १० मार्च क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातील महिला लोकप्रतिनिधींना व त्यांच्या कुटुंबियांना निवेदने देण्यात येत आहेत, असे मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

राज्यात दारूच्या प्रसाराला प्रोत्साहन देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातून निर्माण होणारे वातावरण हे संपूर्ण समाजाच्या, गरीबांच्या व त्यातही महिलांच्या दृष्टीने अत्यंत दुदैवी आहे. गरीब घरात दारुड्या पुरुषाच्या बाटलीतला प्रत्येक घोट त्याच्या बायकोमुलांच्या भाकरीचा घास हिसकावून घेत असतो. श्रीमंत कुटुंबात दारूच्या दुष्परिणामांना तोंड देण्याची ऐपत असते. तरीही कौटुंबिक उद्धस्तता रोखण्यासाठी एकेकाळी महाराष्ट्राच्या संवेदनशील शासनाने बिअर बार बंदीसारखा धाडसी निर्णय घेतला होता. आज, चिमूरपासून नागपूरपर्यंत पायी चालून दारुबंदीची मागणी मान्य करून घेणा-या चंद्रपूरच्या गरीब आदिवासी महिलांना शासनाने एका निर्णयाच्या फटका-याने धुडकावून लावले. दारूचा प्रसार करत, कोरोनामुळे आर्थिक, शैक्षणिक कंबरडे मोडलेल्या कष्टकरी वर्गाच्या, त्यातील महिला-बालकांच्या हालात सरकार आणखीच भर घालत आहे.
वाईन या पेयाची मादकता काहींसाठी सौम्य असेलही, पण चटक, व्यसन लागण्याची त्याची क्षमता वादातीत आहे. ‘व्यसन हा आजार आहे’ असे जागतिक आरोग्य संघटना बजावत आहे. तर, महाराष्ट्रासारखे पुरोगामी सरकार हा आजार पसरवण्याचा अतिरेकी उत्साह दाखवत आहे. याबाबत महिला लोक लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सरकारला जाब विचारला पाहिजे. दारूचे उत्पादन करणार्‍या कंपन्या दारूचा खप वाढावा, त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळावा याकरिता प्रयत्नशील राहतीलच, हे एकवेळ समजू शकतो. परंतु, आपल्या जनतेचे पोषणमान व राहिणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टींची घटनादत्त जबाबदारी असणा-या राज्यकर्त्यांकडूनच आपल्या जनतेचे, अशा प्रकारे शोषण होण्यासाठी व्यसनवर्धक नीतीला राज्यमान्यता देणे आपणांस योग्या वाटते का? असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

 

‘एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करायचे असेल तर त्यातील महिलांची स्थिती पहावी’ आणि ‘एखाद्या सरकारचे महिला विषयक धोरण अभ्यासायचे असेल तर त्याचे दारूविषयक धोरण अभ्यासावे’ असे समाजशास्त्रीय संकेत आहेत. राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणाच्या मसुद्यात दारूविषयक नीतीचा साधा उल्लेखही नाही. २०२२ हे ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. दारूचा प्रसार करणारे सरकार कष्टकरी, शेतकरी महिलांना दारूवर्धक नीती ऐवजी सन्मानाचे जीवन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. बिहारमधील सरकारने २०१६ साली राज्यात दारूबंदी सारखा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यातील दारूबंदी नंतरच्या व दारूबंदी आधीच्या घटनांविषयी माहिती अचंबित करणारी वाटते. २०१३ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अत्याचार झालेल्या ४३३२ घटना घडल्या होत्या. राज्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर म्हणजेच २०१७ ते २०१९ या कालावतीत या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन २७७० घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे दारू बंदीनंतर सुमारे १५६२ घटना कमी झालेल्या दिसतात. याप्रमाणे हुंड्यासाठी झालेले मृत्यू, बलात्काराचा प्रयत्न करणा-या घटना व प्रत्यक्ष बलात्कार झालेल्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. (यासाठी शेवटी दिलेला तक्ता पाहावा.) यासाठी आपण महिला लोकप्रतिनिधी म्हणून ठोस भूमिका घ्यावी. राज्य सरकारच्या या निणर्यांमुळे महिला मोठ्या प्रमाणात दुःखी आहेत. विविध समाज माध्यमातून त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याची गंभीर दखल आपण लोकप्रतिनिधी या नात्याने घ्यावी, असे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने आवाहन करण्यात आले, असे मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील व वर्षा विद्या विलास यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Tags: Addictionव्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचव्यसन वर्धक नीती
Previous Post

मोदी-बेनेट यांच्या आवाहनानंतर खरचं पुतीन शांत…की त्सुनामीआधीची शांतता?

Next Post

शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Next Post
शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद

शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Comments 1

  1. Avinash Patil, MANS's Vivek Jagar. says:
    3 years ago

    I am Welcome your initiative. We are with you !
    – Avinash Patil,
    MANS’S Vivek Jagar.
    State Convenor of VMMSM Vyasan Mukta Maharashtra Samanvay Manch.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!