Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी तरुण शेतकऱ्याचं कृषिमंत्री दादाजी भुसेंना पत्र

May 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
dadaji bhuse

मुक्तपीठ टीम

 

मराठवाड्यातील खरीपाची पिके अतिवृष्टीने अनेक मोठ्या प्रमाणात उध्वस्त होऊनही पिक विम्यातून वगळण्यात आली आहेत. ती नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके समाविष्ट करणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकारने त्वरित पिक विमा नुकसानभरपाई अशी मागणी नांदेडमधील तुषार देशमुख या तरुण शेतकऱ्याने खुल्या पत्राद्वारे केली आहे.

तरुण शेतकऱ्याचे कृषिमंत्र्यांना खुले पत्र

प्रति,
मा. दादाजी भुसे,
कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय,

मराठवाड्यात मुख्यतः गेल्या खरीप हंगामात वास्तवात अतिवृष्टी, बोगस बियाणे यामुळे दुबार पेरणी ही दोन्ही अस्मानी, सुलतानी संकटे आलेली होती हे आपल्याला चांगल्या पैकी ज्ञात आहे. विशेषतः अतिप्रमाणात झालेल्या पावसामुळे सोयाबिन, तुर,मुग, उडीद, या पिकांचे नुकसान झालेच, शिवाय हदगाव/हिमायतनगर तालुक्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा, कयाधू नद्या, पैनगंगा ईसापुर राज्यात क्रमांक २ चा प्रकल्प आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने नदीपात्राव्दारे पाण्याचा विसर्गही करण्यात येत होता. त्यामुळे होती नव्हती अशी सर्व पिके उध्वस्त झाली. संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीने नुकसानग्रस्त होता. पण हदगाव/ हिमायतनगर ही दोन तालुके पैनगंगा/कयाधू ह्या नद्यांच्या पुराच्या तडाख्याने उद्धवस्तच झाली. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, व मुंबई येथे प्रत्यक्ष आपल्याला झालेल्या नुकसानीची मागील चार महिन्यापुर्वी निवेदनाव्दारे कल्पना पिक विम्या व्दारे मदतीची कल्पना दिली होती. आपल्या कार्यालयाकडून केवळ पाठपुरावा संबंधी विचारले असता कृषी आयुक्त पुणे/संबंधित विमा कंपनी यांच्याशी चर्चा सुरू आहे असे वेळोवेळी निरर्थक उत्तराशिवाय, संदेशाशीवाय काहीच प्राप्त झाले नाही. तोपर्यंत आमच्या कडील काही भागात पिक विमा मंजुर झालेला असताना अजुनही किती दिवस चौकशीच्या गोड आश्वासनाच्या नावाखाली या मुख्य प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न दिसून येतोय.

कोरोना परिस्थितीची दीड वर्षापासून, शेतकरी झळ सोसतोय. प्रलंबित कर्जमाफी, अशा अनेक संकटात असताना खरीप हंगाम पूर्णपणे गेलेला असताना या संकटाचा सामना आता सहन करु शकणार नाही. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपली असेल. आपणास नम्र निवेदन. पुनश्च सखोल विचार करुन संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तुम्हाला मोठ्या अपेक्षेने सत्तेवर आरुढ केलंय त्याचं देणं म्हणून तरी न्याय द्यावा, हीच अपेक्षा!

आपला नम्र
तुषार देशमुख
नांदेड 8888319919


Tags: Dadaji BhuseMarathwadatushar deshmukhकृषिमंत्री दादाजी भुसेखरीप पिकतुषार देशमुखमराठवाडा
Previous Post

उच्च रक्तदाब…बदला आहार…आणा नियंत्रण…नाहीतर कोरोनाचा जास्त धोका!

Next Post

जगाला औषधं पुरवणाऱ्या भारतातच का लसींचा तुटवडा?

Next Post
corona india

जगाला औषधं पुरवणाऱ्या भारतातच का लसींचा तुटवडा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!