मुक्तपीठ टीम
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी १३ मार्च रोजी इशारा दिला होता की, “सध्या दिवसाला सुमारे पंधरा हजार रुग्ण सापडत आहेत. हा वेग कायम राहिला तर १५ एप्रिलपर्यंत म्हणजे पुढच्या एक महिन्यात दिवसाला २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील.” आज अवघ्या चार दिवसांनी महाराष्ट्रात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच मुख्य सचिवांनी जो धोका एक महिनाभरानं उद्भवू शकतो, अशा इशारा दिला, तोच धोका अवघ्या चार दिवसात प्रत्यक्षात आला आहे.
- आज राज्यात २३,१७९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण १,५२,७६० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.२६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
काय म्हणाले होते मुख्य सचिव सिताराम कुंटे?
दिवसाला २५ हजार कोरोना रुग्णांचा इशारा का दिला मुख्य सचिवांनी?
गेल्या २४ तासात निदान झालेले कोरोनाचे नवे रुग्ण:
आज राज्यात २३,१७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,७०,५०७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका २,३७७
२ ठाणे २३७
३ ठाणे मनपा ५१६
४ नवी मुंबई मनपा ३६७
५ कल्याण डोंबवली मनपा ६३७
६ उल्हासनगर मनपा ६४
७ भिवंडी निजामपूर मनपा २४
८ मीरा भाईंदर मनपा १०७
९ पालघर ४१
१० वसईविरार मनपा ७४
११ रायगड १३४
१२ पनवेल मनपा २३३
१३ नाशिक ५१८
१४ नाशिक मनपा १,४९०
१५ मालेगाव मनपा ११८
१६ अहमदनगर ४३८
१७ अहमदनगर मनपा १६४
१८ धुळे १६७
१९ धुळे मनपा १७०
२० जळगाव ३८४
२१ जळगाव मनपा १८६
२२ नंदूरबार ३८२
२३ पुणे ९०६
२४ पुणे मनपा २,६१२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १,२०६
२६ सोलापूर १२२
२७ सोलापूर मनपा ११९
२८ सातारा ३०३
२९ कोल्हापूर ३०
३० कोल्हापूर मनपा १९
३१ सांगली ७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४६
३३ सिंधुदुर्ग १८
३४ रत्नागिरी ८
कोल्हापूर मंडळ एकूण १९३
३५ औरंगाबाद १६६
३६ औरंगाबाद मनपा ९७९
३७ जालना १९०
३८ हिंगोली ७४
३९ परभणी ६८
४० परभणी मनपा १२४
४१ लातूर ६९
४२ लातूर मनपा ११८
४३ उस्मानाबाद १०६
४४ बीड २६५
४५ नांदेड २२४
४६ नांदेड मनपा २६२
४७ अकोला ११३
४८ अकोला मनपा ३४२
४९ अमरावती २४८
५० अमरावती मनपा २२१
५१ यवतमाळ ३६३
५२ बुलढाणा ५३२
५३ वाशिम २८१
५४ नागपूर ७०७
५५ नागपूर मनपा २,६९८
५६ वर्धा ३६०
५७ भंडारा १४४
५८ गोंदिया ३९
५९ चंद्रपूर ६३
६० चंद्रपूर मनपा ८७
६१ गडचिरोली ४७
एकूण २३,१७९
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ८४ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे- ७, नशिक-३, गडचिरोली– २, नागपूर– १ आणि नांदेड– १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.