Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

32 हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा खरा अजेंडा !

December 22, 2020
in सरळस्पष्ट
0
32 हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा खरा अजेंडा !

एका न्यूज चॅनलचा दुसऱ्या न्यूज चॅनलवर हल्ला…तेही थेट नाव घेऊन…एका अँकरची दुसऱ्या अँकरवर चढाई…तीही थेट नाव घेऊन…आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडत आहे. भारतातील टीव्ही चॅनल्समध्ये उघड युद्ध रंगले आहे. रिपब्लिक टीव्ही नावचे अर्णब गोस्वामी यांचे चॅनल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अपवाद वगळता इतर सर्व न्यूज चॅनल्स. हा सामना रंगला त्याचे कारणही तसेच आहे. अर्णब गोस्वामी म्हटले की टोकाची आक्रमकता. आक्रस्ताळी म्हणता येईल अशी शैली. त्यांनी रिपब्लिक टीव्हीला टीआरपी स्पर्धेत कमालीचे पुढे नेले. पत्रकारितेचे संकेत धुडकावत बेधडक त्यांनी आपली एक वेगळी शैलीच तयार केली. एका मर्यादेपलिकडे तसे करणे इतर न्यूज चॅनल्सना मानवणारे नव्हते.

मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दोन स्थानिक मनोरंजन वाहिन्या, फक्त मराठी आणि बॉक्सऑफिस यांच्या जोडीनेच रिपब्लिक टीव्हीने टीआरपी मिळवण्यासाठी घोटाळा केल्याचा आरोप केला, आणि इतर चॅनल्सना जी पाहिजे ती संधी मिळाली. अर्णब गोस्वामींनी केवळ पत्रकारितेचीच नाही तर व्यावसायिक नीतीमत्तेचेही संकेत धुडकावून टीआरपी घोटाळ्याचा गंभीर गुन्हा केल्याचा आरोप जवळ-जवळ प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी चॅनलनं केला. मोहिमच राबवली गेली. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली ती टीआरपी युद्धाविषयी. टीव्ही तर पाहतो पण ही टीआरपीची भानगड आहे तरी काय?

टीआरपी म्हणजे नेमकं काय?
ज्या प्रमाणे जाहिरातदार वृत्तपत्रांची वाचकसंख्या, खप, वाचकांची वर्गवारी लक्षात घेऊन प्रिंट मीडियात कोणाला किती जाहिराती द्यायच्या ते ठरवतात तसंच टीव्ही चॅनल्सना जाहिराती देताना टीआरपी लक्षात घेतला जातो. टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. आपल्या देशात 201-16पर्यंत टॅम नावाची संस्था टीआरपी ठरवत असे. अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भारतातील टीव्ही चॅनल्सची संघटना नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन आणि जाहिरातदारांच्या दोन संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल म्हणजेच बार्क ही संस्था स्थापन झाली. 2016पासून बार्क ही संस्थाच भारतात टीव्ही चॅनल्सचा टीआरपी ठरवते.  वृत्तपत्र ही छापली जातात. त्यांची संख्या मोजता येते. टीव्ही प्रेक्षक कसे मोजणार? त्यासाठी देशभरातील प्रेक्षकांपैकी ठराविकांच्या घरांमध्ये मीटर लावले जातात. हंस रिसर्च या वेगळ्या एजेंसीच्या माध्यमातून एकत्र करून तिच्या विश्लेषणानंतर बार्क टीव्ही रेटिंग जाहीर करते. दर गुरुवारी टीआरपीचे आकडे जाहीर केले जातात.

टीआरपी कसा ठरवला जातो ?
बार्कने स्थापनेनंतर देशभरातील २२ हजार घरांमध्ये बार ओ मीटर बसवले. टीव्ही रेटिंग नोंदवण्यासाठी या मीटरचा उपयोग करण्यात येतो. खरंतर भारतात शहरी भागाएवढेच ग्रामीण भागही महत्वाचे आहेत. तरीही टॅम असताना ग्रामीण भागाला तेवढे महत्व नव्हते. मात्र, बार्क अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच छोटी शहरं, ग्रामीण भागाचा भारतीय टीव्ही रेटिंगमध्ये भागिदारी वाढली. त्यावेळी खरंतर ५० हजारांपर्यंत चार वर्षात मीटर लावण्याची घोषणा झाली होती. मात्र, आजही तेवढ्या घरांपर्यंत बार्क पोहचू शकलेली नाही. आताही देशभरात फारतर ३० हजारांपर्यंतच मीटर असतील, त्यातील 2 हजारच्या जवळपास मीटर अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या महामुंबईत आहेत.  टीआरपी हा मुळात जाहिरातदारांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे त्यांना कोणत्या उत्पादनाची कोणत्या चॅनलवर जाहिरात करायची हे कळावे यासाठी टीव्ही प्रेक्षकांच्या घरांची निवड आर्थिक, भौगोलिक, शहरी-ग्रामीण असे सर्व गट लक्षात ठेवून केली जाते.
बार्कची टीम हंसा एजेंसीच्या माध्यमातून प्रेक्षक कुटुंबांची ठरलेल्या निकषांनुसार निवड करते. त्यांना विश्वासात घेऊन बार्कचा बार ओ मीटर घरातील टीव्हीशी जोडला जातो. ठराविक काळानंतर ही कुटुंबे बदलली जात असल्याचाही दावा केला जातो.
त्या मीटरसाठी वेगळा रिमोट असतो. घरातील सदस्यांना टीव्ही पाहताना रिमोटचा वापर करताना लिंग, वय यानुसार ठरवून दिलेली बटणे दाबूनच टीव्ही पाहण्याच्या सूचना दिल्या जातात.
देशभरातील प्रेक्षकांमधील निवडकांच्या घरच्या मीटरमधील आकडेवारी बार्कसाठी हंसा रिसर्च एजेंसी गोळा करते. त्या आकडेवारीचं बार्कने ठरवलेल्या निकषांनुसार विश्लेषण केले जाते. केवळ किती प्रेक्षकांनी पाहिलं यावर नाही तर किती वेळ पाहिलं म्हणजेच टाइम स्पेंट हेही टीव्ही रेटिंग ठरवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक आहे.

टीआरपी घोटाळा खरेच शक्य आहे ?
एक लक्षात घेतले पाहिजे की टीआरपी हे पत्रकारांसाठी नसतात. मुळात टीआरपीचा उद्देश जाहिरातदारांची सोय हा असतो. त्यामुळे स्वाभाविकच सर्वच चॅनल्स टीआरपीसाठी प्रयत्न करतात तेव्हा त्यांचाही उद्देश जाहिरातदारांनी आपल्याच चॅनलला जाहिरात देण्यासाठी प्राधान्य द्यावे यासाठी प्रयत्न करण्याचा असतो. त्यासाठी मग वाट्टेल ते प्रयत्न केले जातात. अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवे असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो.

खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीव्ही समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो ते लक्ष्य असते 32 हजार कोटींचे! होय, तब्बल 32 हजार कोटींचे! हा आकडा भारतातील टीव्ही चॅनल्सना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. या 32 हजार कोटींच्या उत्पन्नात आपल्या चॅनल्सना जास्तीत जास्त वाटा मिळावा यासाठीच सारे प्रयत्न असतात. मग पडद्यावर संपादक, रिपोर्टर, अँकर कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात भूमिका मांडो. खरा उद्देश किंवा लक्ष्य असते ते या 32 हजार कोटींमधील आपल्यासाठीच्या वाट्याला वाढवण्यावरच. जोपर्यंत कॉन्टेंटच्या जोरावर टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करताना काही चॅनल्स जे मार्ग स्वीकारतात तेही टीकेचे लक्ष्य होतात. ही कसली पत्रकारिता करुन अशांना नाकं मुरडली जातात. सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिपब्लिक टीव्ही हे चॅनल अशा बाबतीत जरा जास्तच टोकाला जाणारे. परंतु यात इतर हिंदी किंवा आपले मराठी चॅनल्स मागे असतात, अशा भ्रमात राहू नका. हवंतर आठवून पाहा सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील कव्हरेज. देशात इतर काही नाही फक्त तेच एक प्रकरण असल्याचा साऱ्यांचाच अविर्भाव होता. फारतर ढंग वेगळा असेल. रंग तोच एक होता.

पूर्वीच्या टॅमप्रमाणे आताची बार्कही टीव्ही रेटिंग मीटर कोणत्या घरांमध्ये लावलेत ते कमालीचे गुप्त राखल्याचा दावा करते. पण टॅमच्या काळातही आणि आताही टीआरपी घोटाळ्यांचे आरोप झालेत. टीव्ही चॅनल्सचे काही एजंट टीव्ही मीटर असलेल्या घरांपर्यंत जातात. कि त्यांच्यावतीने संपर्क साधून टीव्ही रेटिंग सोयीनुसार ठरवण्याचा प्रयत्न करतात, असे आरोप झालेत. काही वेळा तर बार्क किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या हंसा रिसर्चसारख्या एजेंसीशी संबंधित काही चॅनल्सशी संपर्क साधून ऑफरही देतात. ते मीटर असलेल्या घरातील कुटुंबांना आर्थिक आमिष दाखवून सतत एकच चॅनल सुरु ठेवण्यास सांगतात. अनेक ठिकाणी श्रीमंत, मध्यमवर्गीय कुटुंबं अशी मीटर लावण्यास तयार नसतात. अनेकदा असे मीटर आर्थिक कमकुवत कुटुंबांकडेच बसवलेली असतात. वेगवेगळे  प्रयत्न करून हे एजंट आपल्याला पाहिजे ते साध्य करतात. काहीवेळा एमएसओ किंवा वितरकांशी अधिक़ृत संगनमत करून सेट टॉप बॉक्स सुरु केल्यावर टीव्हीवर जी पहिली स्क्रिन दिसते तिला लँडिग पेज म्हणतात. तीच ताब्यात घेण्याची क्लुप्तीही काही चॅनल्स अर्थबळावर लढवतात.
यामुळे मीटर असलेल्या निवडक घरांमधील विशिष्ट घरांमध्ये सतत एकच टीव्ही चॅनल सुरु राहतो. त्यामुळे ठराविक संख्या तसंच जास्ती वेळ पाहिल्याची नोंद संबंधित चॅनलच्या खात्यात जमा होते. त्याचा परिणाम त्यांचा टीआरपी वाढण्यात होतो. अडीच कोटींच्या महामुंबईत फक्त दोन हजार मीटर. म्हणजे मुंबई जिंकायची तर फक्त 500 घरे किंवा त्यापेक्षाही कमी वश केली तरी चालतात. तसंच देशभरात.

घोटाळे थांबणार कसे ?
टीआरपी ठरवणारी बार्क ही संस्थाही घोटाळे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असेत. काही उपाययोजना करते. काही तक्रारी आल्याने बार्कने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल  केले आहेत. बार्कने थेट मान्य केले नसले तरी काही वेळा रेटिंगमध्ये बाह्य प्रभाव पडत असल्याचे डेटा व्हॅलिडेशन क्वालिटी इनिशिएटिव्ह सुरु करून दाखवून दिले होते.

बार्कने सर्वात महत्वाचे पाऊल उचलले आहे ते संपूर्ण रेटिंग पद्धतीचाच आढावा घेण्याचे. तसे करण्यासाठी बार्कने पुढील १२ आठवड्यांसाठी सर्वभाषिक न्यूज चॅनल्सतचे टीआरपी आकडे जाहीर केले जाणार नाहीत असे घोषित केले आहे. या कालावधीत बार्कची तांत्रिक समिती रेटिंग प्रक्रियेचा अभ्यास करुन, दोष हुडकून, ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे जाहिरात उत्पन्नावर परिणाम होईल का, तर ती शक्यता कमी आहे, असे जाहिरात क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. एवढं नक्की की संशय निर्माण झालेल्या चॅनल्सना पार्लेसारखे प्रतिमा जपणारे ब्रँड जाहिरात देणार नाहीत. पण इतर न्यूज चॅनल्सना जाहिराती सुरु राहतील.

मधल्या काळात न्यूज चॅनल्सच्या लोकप्रियतेत काहीही चढउतार झाले तरी त्यांची माहिती सध्या मिळणार नसल्याने जाहिरातदारांना जाहिरात प्रमाणात बदल करणे किंवा चॅनल्सना त्याचा लाभ घेऊन जास्त उत्पन्नासाठी प्रयत्न करणे शक्य होणार नाही. जसे सध्या मराठी न्यूज चॅनल्समध्ये नंबर १ असलेल्या एबीपी माझा या न्यूज चॅनलचे ते स्थान तसेच कायम दिसेल.

सध्या तरी न्यूज जॉनरच्याबाबतीत हा निर्णय घेतला गेला आहे. पण लवकरच बार्कने न्यूजव्यतिरिक्त इतर चॅनल्ससाठीही सुधारणा करणे अपेक्षित मानले जात आहे. या रेटिंग स्थगितीमुळे चॅनल्स किंवा जाहिरातदारांचे जे होईल ते होईल, पत्रकारांना मात्र कमालीचा दिलासा मिळेल एवढं नक्की. दर गुरुवारी टीआरपी जाहीर होत असल्यानं मोठ्या पदांवरील, त्यातही संपादकपदांवरील काहींची झोप उडत असते, न्यूजरुममध्येही काहीसा तणाव असतो. पुढील १२ आठवडे त्यांना शांतपणे माणसांसारखं जगता येईल. टीआरपी घोटाळ्याच्या मंथनातून घेतले जाणारे काही निर्णय असे दिलासा देणारेही असावेत, एवढीच अपेक्षा!

मुळात खरेच जर घोटाळे थांबवायचे असतील तर 130 कोटींच्या देशातील टीआरपी अवघ्या 30-40 हजार एवढ्या कमी मीटर संख्येवर ठरवणे बंद करणे आवश्यक आहे. कारण टीव्ही रेटिंग ज्या मोजक्या सॅम्पल साइझवर ठरवले जाते त्यामुळे टीआरपी घोटाळा सहज शक्य होते.
सध्या भारतात डिजिटल सेटटॉप बॉक्स आहेत. आतील चीपमध्ये काही बदल करून बार्कने वेगळी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. एमएसओ म्हणजे वितरकांच्या सहकार्याने टीव्ही प्रेक्षकांच्या घरांमधील खरी निवड कळू शकेल. सध्या जसे सांगितले जाते तसे लिंग आणि वयोगटाप्रमाणे प्रेक्षक रिमोटचे बटन दाबून बदल नोंदवत असतील ही शक्यता कमीच आहे. त्यामुळे किमान जेवढे प्रेक्षक तेवढी सॅम्पल साइझ झाली तर मुठभरांना विकत घेऊन टीआरपी युद्ध जिंकण्याचा घोटाळा करणे अवघड होईल. अर्थात त्यासाठी बार्कला अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीनं अतिसुरक्षिक यंत्रणा उभारावी लागेल. तसे करणे अवघड नाही. पण मुळात जर प्रेक्षकांनी ठरवले तरीही घोटाळे होणारच नाहीत. केवळ शे रुपयांच्या बदल्यात 32 हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नासाठी घोटाळा करु द्यायचा का ते प्रेक्षकांनीही विचार केला पाहिजे. जर त्यांनी आपल्या मनाप्रमाणे रिमोटचा मग तो टीव्हीचा असो किंवा टीआरपी ठरवणाऱ्या बार ओ मीटरचा, तर योग्य निवड होईल. नको ते पडद्यावर मारणाऱ्यांचे फावणार नाही. आणि पाहिले न जाणारे चॅनल टीआरपीत पुढे असल्याचे पाहावे लागणार नाही. गरज प्रेक्षकांनीही सजग होण्याची आहे.

– तुळशीदास भोईटे


Tags: ScamTRP
Previous Post

मंत्रालय गहाण ठेवा…पण हक्काचे पगार वेळेवर द्या!

Next Post

सुशांतचा तपास, सर्वच नापास !

Next Post
सुशांतचा तपास, सर्वच नापास !

सुशांतचा तपास, सर्वच नापास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!