Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home व्हिडीओ

‘पंतप्रधान’ मोदींचं असं कसं भाषण? काँग्रेसविरोधी राजकारण की महाराष्ट्राचा अपमान?

पंतप्रधान म्हणाले तसे पक्षीय राजकारणापासून वर झेपावणार?

February 8, 2022
in व्हिडीओ
0

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

खरंतर सकाळपासून मुंबईबाहेर आहे. जिथं आहे तिथं जियोसोडून कसलंही नेटवर्क नाही. डिजिटल इंडिया म्हटलं तरीही तोही इंडिया भारत असा भेदभाव करतोच. त्याच्यावर पुन्हा कधीतरी. त्यामुळे दुपारी झालेली सरळस्पष्ट चर्चा एवढ्या उशिरा मांडावी लागत आहे.

सुरुवातच भाजपाविरोधातून झाली असं भाजपा समर्थकांना वाटू शकतं. पण जिथं चांगलं तिथं चांगलंच आणि जिथं वाईट तिथं वाईटचं म्हणायचं, हार जसे अर्पण करायचे तसेच प्रहारही करायचे हे मुक्तपीठचं धोरण आहे.

उत्तरप्रदेश, उत्तराखंडसाठीचं प्रचार भाषण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात ठेऊन केलेले हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोना पसरण्याविषयी जो मुद्दा तयार केला त्यावरून दिसून येत आहे. कोणी कितीही मुरब्बी असलं तरी हिडन अजेंडा आजकाल हिडन राहत नसतो. तरीही ते भाषण चाललं असतं. कारण सरळस्पष्ट चर्चेत सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक म्हणाले तसे राजकारण होत असतं. मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करणंही स्वाभाविकच आहे. मात्र, त्यांना तो महा विकास आघाडीचा अपमान वाटतो. महाराष्ट्राचा नाही.

 

भाषण खटकणारंच, कारण पंतप्रधानांचं होतं, फक्त भाजपा नेते नरेंद्र मोदींचं नव्हतं!

देशाच्या संसदेत केलेलं ते भाषण आहे. तेही एखाद्या भाजपा नेत्यांने नाही. त्याने जर महाराष्ट्राचा असा अपमान केला असता तर त्याला आणखीच शेलक्या भाषेत सुनावणंही चुकीचं म्हणता आलं नसतं. पण नरेंद्र मोदी हे फक्त भाजपा नेते नाहीत, त्यांच्यावर टीका होते तसे ते फक्त भाजपाचे प्रधान प्रचारक नाहीत, तर देशाचे पंतप्रधानही आहेत. त्यांचं बोलणं, त्यांचे अनेक निर्णय यामुळे अनेकदा माझ्यासारख्यालाही ते देशाचे पंतप्रधान कमी आणि गुजरात आणि उत्तरप्रदेश या द्विभाषिकाचे किंवा जिथं निवडणूक असते त्या राज्यांपुरतेच मर्यादित पंतप्रधान वाटतात. म्हणजे महाराष्ट्रातील मोठमोठे नेते जरी दिल्लीत गेले तरी त्यांचं राज्यातील सत्तेत मन गुंतलेलं राहतं, किंवा खासदारांचं संसदेपेक्षा जिप, मनपा कारभारावर लक्ष राहतं तसंच त्यांचं वाटतं. तसं असू नये.

 

महाराष्ट्र वाहतो देशाचा बोजा!

महाराष्ट्र हा देशाचा बोजा वाहत आला आहे. त्याला कुणाचा बोजा होत नसतो. त्यामुळेच सामान्यातील सामान्य भारतीय हक्कानं त्याच्या देशाच्या आर्थिक राजधानीत येतो तेव्हा इथं त्याचा इतर राज्यांप्रमाणे छळ होतं नाही. दिल्लीत बिहारी कष्टकऱ्यांना अपशब्द वापरून ये बिहाडी संबोधतात. पंजाबात कसं वागवतात ते बिहारी नेतेच अनेकदा सांगतात. आसाममध्ये काही वर्षांपूर्वी उत्तरभारतीयांच्या वस्त्या जाळण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात मनसेनं फक्त एक टॅक्सी फोडली तर तीच क्लिप दिवसभर लूपमध्ये टाकत मराठी माणसांनी जणू उत्तर भारतीयांना संपवल्याचा कांगावा केला गेला.

 

मजुरांची कामाची, महाराष्ट्राची श्रमाची गरज!

महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं स्थानिक असो की उपरे एकाचाही कोरोना संकटात भुकेनं मृत्यू झाला नाही. मजूर आम्ही संकटात होतो तेव्हा पळून गेले आणि चांगले दिवस आले तर परतले, असं कुणीच त्यांना नंतरही हिणवलं नाही. कारण त्यांना जशी कामाची गरज तशीच महाराष्ट्रालाही त्यांच्या श्रमाची गरज, हे मराठी माणूस ओळखून असतो.

 

पंतप्रधान म्हणाले तसे त्यांनीही पक्षीय राजकारणापासून वर झेपावण्याची गरज!

त्यामुळे पंतप्रधानपदावरी व्यक्तीने तरी किमान एखाद्या राज्यासाठी अपमानास्पद ठरतील असे शब्द वापरू नयेत. त्यांच्याच भाषणातील शब्दाच सांगायचे तर “कभी तो दलगत राजनीति से उपर उठना चाहिए”
पण देशाचा विचार करून पक्षीय राजकारणातून वर झेपावणं त्यांना आणि त्यांच्या इतर भाजपा नेत्यांनाही जमत नाही. त्यामुळे काय कोणाकडून अपेक्षा ठेवणार?

( तुळशीदास भोईटे मुक्तपीठ मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.)

संपर्क – ९८३३७९४९६१ ट्विटर @TulsidasBhoite

चर्चेत सहभागी इतर मान्यवरांच्या भूमिका थोडक्यात:

गिरीश अवघडे

पुण्यातून चर्चेत सहभागी गिरीष अवघडे यांनी कोरोना लाट आल्यापासूनच मोदी सरकारचे कसे चुकले ते मांडत ट्रम्प यांचा भारतातून केलेला प्रचाराचा शुभारंभ वगैरेचा उल्लेख करत केंद्र सरकारच कसं जबाबदार ते मांडलं. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे भाषण कसे करु शकते असा प्रश्न विचारत त्यांनी महाराष्ट्राचा अपमानच झाल्याचे बजावले.

 

अॅड. जयेश वाणी

अॅड जयेश वाणी यांनी कोरोना संकटात मुंबई महाराष्ट्रानं बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करत भाजपाने त्यावेळी जे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केले. आघाडी सरकारविरोधात कसे राजकारण केले, त्याची आठवण करून देत पंतप्रधानांनी मुळात संघराज्यभावनेचाच घात केल्याचे म्हटले. त्यांनी भाजपाच्या नेत्यांना महाराष्ट्राच्या या अपमानाबद्दलही भूमिका मांडण्यास सांगितले.

या सर्व मान्यवरांचे संपूर्ण बोलणे समजून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा:


Tags: Maharashtramarathi newsmuktpeethNarendra modipolitical analysissaralspashttulsidas bhoiteतुळशीदास भोईटेनरेंद्र मोदीमराठी बातम्यामहाराष्ट्रमुक्तपीठराजकीय विश्लेषणसरळस्पष्ट
Previous Post

भाजपानं महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी! पंतप्रधानांनी असं बोलणं दु:ख देणारंच! – सुप्रिया सुळे

Next Post

राज्यात नवे रुग्ण ६ हजार १०७! १६ हजारावर रुग्ण बरे!

Next Post
maharashtra corona report

राज्यात नवे रुग्ण ६ हजार १०७! १६ हजारावर रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!