Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अपघाती मृत्यू रोखले तर प्रती व्यक्ती ९० लाख रुपयांची बचत!

गडकरी यांचा अहवालाचा दाखला देत मृत्यू रोखण्यासाठी वाहन सुरक्षेचे आवाहन

February 14, 2021
in सरकारी बातम्या
0
Road Accidents -1 (2)

मुक्तपीठ टीम

सामाजिक जबाबदारी म्हणून वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांमध्ये किमान वाजवी दरात मूलभूत सुरक्षा सोयी-सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. जर आपण रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखू शकलो, तर आपण प्रती व्यक्ती ९० लाख रुपयांची बचत करु शकतो, असे निरीक्षण अलीकडेच प्रसिध्द झालेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे, असे सांगत गडकरी म्हणाले की वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या सुरक्षा सुविधांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. “अपघातात होणाऱ्या जखमा आणि येणारे अपंगत्व: भारतीय समाजावरील ओझे” या शीर्षकाच्या जागतिक बँकेच्या अहवालाचे प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सेव्ह लाईफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हे अध्ययन करण्यात आले आहे.

अपघातांचे भारतावरील ओझे

• रस्ते अपघातांचे भारतीय समाजावर आणि देशावर मोठे ओझे आहे, असे ढोबळ निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे.
• रस्ते अपघातातील मृत्यू आणि जखमांचे प्रमाण कमी केल्यास, उत्पन्नात वाढ होऊ शकते.
• कमी खर्चातल्या रस्ते सुरक्षा सुविधा उपलब्ध केल्यास व्यापक कल्याण साध्य केले जाऊ शकते.
• कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रस्ते अपघात होणारे मृत्यू आणि जखमा/अपंगत्व यामुळे कार्यरत वयातील प्रौढांच्या उत्पन्नात घट होऊन, त्याचा देशाच्या एकूण उत्पन्नांवर परिणाम होतो.

रस्ते अपघात हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून भारतासारख्या देशात ते एक मोठे आव्हान ठरले आहे, असे गडकरी म्हणाले. रस्ते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी मंत्रालय विविध उपाययोजना करत असून त्याचाच भाग म्हणून चार-ई म्हणजे अभियांत्रिकी, शिक्षण, अंमलबजावणी आणि आपत्कालीन काळजी सेवा, अधिक बळकट केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार जागतिक बँकेसोबत विविध प्रकल्पांवर काम करत आहे, त्यापैकी एक म्हणजे रस्ते अपघात डेटाबेस सुयोग्य पद्धतीने तयार करणे हे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या अहवालातील महत्वाच्या निरीक्षणांविषयी बोलतांना ते म्हणाले की देशातील गरीब कुटुंबांमध्ये रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण श्रीमंत कुटुंबांपेक्षा अधिक आहे. व्यक्तीचा आर्थिक स्तर काहीही असला तरी,सरकारसाठी प्रत्येक मानवी जीव महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही संस्थांत्मक सुधारणा अत्यंत गरजेच्या असून, सुरळीत,भक्कम आणि सुलभ अशी कायदेशीर, विमा तसेच आरोग्य व्यवस्था असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

अपघाती मृत्यू रोखण्यासाठीच्या शिफारशी

• अपघातप्रवण रस्त्यांवर सुरक्षा उपाययोजना
• कॅशलेस उपचार
• नागरी आणि आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
• विम्याची तसेच नुकसानभरपाईची व्यवस्था खालच्या स्तरापर्यंत पोहोचवणे
• सर्व हितसंबंधी गटांना एकत्रित आणून नियोजन
अशा उपाययोजनांची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार, मोटार वाहन सुधारणा कायदा २०१९ आणि मोटार वाहन अधिनियमात दुरुत्या करता येतील, असे त्यांनी सांगितले.
सध्या देशात पहिल्यांदाच ‘रस्ते सुरक्षा माह’पाळला जात असून, त्याचवेळी जागतिक बँकेचा हा अहवाल प्रसिद्ध होण्याला विशेष महत्त्व आहे.


Tags: Nitin Gadkariroad accidents in indiaनितीन गडकरीभारतातील रस्ते अपघात
Previous Post

टोळधाडीमुळे देशातील १३ हजार तर महाराष्ट्रातील ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next Post

नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिप संधीचा आज शेवटचा दिवस

Next Post
Directorate Of Printing

नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिप संधीचा आज शेवटचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!