Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“शारीरिक, मानसिकच नाही तर सामाजिक साधनाही…भेदाभेदांच्या पलीकडील नाथपंथ!”

April 25, 2022
in featured, धर्म, व्हा अभिव्यक्त!
0
Mayur joshi Vha abhivyakt on NathPanth

मयूर जोशी

नवनाथ आणि बाकीचे नाथपंथी योगी आपणास ऐकून माहीत असतीलच. बर्‍याचशा लोकांनी नवनाथांच्या पोथीचे पारायण देखील केलेले असेल. एकूणच भारतीय इतिहासामध्ये नाथपंथाचे कार्य इतके मोठे आहे की सर्वकाही त्यांचेच असून त्यांचे नावही कोठे नाही.

नाथ संप्रदायाचे प्रमुख मच्छिंद्रनाथ व त्यांचे प्रमुख शिष्य गोरक्षनाथ यांनी भारतीय इतिहासाला अत्यंत उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले आहेत. धर्म जातीभेद या सर्वांचा त्यांनी विरोध केला. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ हे मासे पकडणाऱ्या कुटुंबामधील. गोरक्षनाथ हे कश्मीरी पंडितांच्या कुटुंबातून आलेले. साधारण नवव्या व दहाव्या शतकामध्ये ही होऊन गेलेली गुरु-शिष्याची जोडी. या सर्व परिपूर्ण आणि अत्यंत देखण्या अशा ब्राह्मण तरुणाचे गुरु हे एका खालील जातीमधील होते. व त्यांची गुरुसेवा आणि गुरुभक्ती ही आत्तापर्यंत मी ऐकलेल्या कोणत्याही शिष्याच्या फार वेगळी आणि असामान्य आहे.

मच्छिंद्रनाथ हे स्त्री राज्यांमध्ये मोहमाया मध्ये अडकलेले असताना (नाथ ग्रंथांमध्ये दिलेल्या उल्लेखाप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी हनुमानाला जे वचन दिले होते ते पूर्ण करण्याकरता स्त्री राज्यांमध्ये ते लग्न करून रममाण झाले होते) या शिष्याने आपल्या गुरूला तेथून सोडवून आणले. व एका प्रकारे पतित झालेल्या गुरुला पुन्हा आपल्या गुरुस्थानीच बसवून त्यांच्या चरणांची सेवा या शिष्याने केली. अशी गुरु-शिष्याची जोडी फारच वेगळी आहे.

परमेश्वर प्राप्ती व मुक्ती हा प्रत्येक जन्मलेल्या मनुष्याचा मूलभूत अधिकार आहे.त्यासाठी स्त्री-पुरुष जाती भेद धर्म वर्ण या कशाचेही बंधन नाही. हा प्रसार मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांनी केला. त्या काळामध्ये असा प्रचार प्रसार केल्यामुळे त्यांचे शत्रू देखील अनेक होते. परंतु नाथ संप्रदाय खास करून या नवनाथांच्या काळातला इतका प्रबळ होता हे त्यांच्या विरुद्ध कोणीही काहीही करू शकले नाही.

त्या काळामध्ये नाथ संप्रदाय किती पसरला असेल ते बघा. तिबेटमधील बुद्ध हे मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ यांना महापुरुष मानतात. नेपाळमधील गुरखा ही अत्यंत धाडसी आणि प्रसिद्ध असलेले जमात गोरखनाथांच्या म्हणजेच गोरक्षनाथांच्या नावा वरून पुढे उदयास आली. कानफाडी संप्रदाय त्याचप्रमाणे शाक्त संप्रदायात हटयोग यामध्ये या दोघांची प्रवीणता वाखाणण्याजोगी होती. शाबरी विद्या जी अत्यंत प्रभावशाली मानले जाते ती गोरक्षनाथांनी निर्माण केली. संस्कृतचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे एक कुशल नर्तक आणि वादक होते. वैराग्य आणि ब्रह्मचर्य या गोष्टींच्या पालन या मध्ये त्यांना उच्च स्थान आहे. उत्तर भारतामधील काश्मीर पंजाब नेपाळ बंगाल तिबेट या सर्व भागांमध्ये नाथ संप्रदायाचे काम प्रचंड आहे. बंगालमधील जी तंत्रविद्या आहे तीदेखील गोरक्षनाथांनी विकसित केली. हल्लीच्या काळामध्ये तंत्र विद्येला विकृत स्वरूप आले आहे तो भाग वेगळा.

परंतु शाबरी आणि तंत्र विद्या यांचे प्रणेते किंवा यांना आधुनिकतेने पुढे नेणारे गोरक्षनाथ हे स्वतः पूर्ण ब्रह्मचारी आणि संन्यासी होते.

आता थोडीफार आपल्या भागातील माहिती घेऊ. गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू हे साधारणतः आठ ते नऊ वर्षाचे असतानाच त्यांना अनुग्रह दिला. म्हणजेच निवृत्तीनाथ हे स्वतः नाथपंथी योगीच होते. त्यापाठोपाठ निवृत्तीने ज्ञानेश्वरांना व ज्ञानेश्वरांनी सोपान आणि मुक्ताबाईंना अनुग्रह दिला. ज्ञानेश्वरांचे शिष्य विसोबा खेचर यांनी नामदेवांना अनुग्रह दिला. त्यांच्यापासून वारकरी संप्रदाय तयार झाला. म्हणजे आता त्यांची व्याप्तीच बघा ना नवनाथांनी जे काम केले होते त्याची. आज आपण जी पंढरीला जाणारी जगातील सगळ्यात मोठी यात्रा आणि वारी बघतो ते नाथपंथी योगी यांनीच सुरू केली होती ज्ञानेश्वर व नामदेव.

महाराष्ट्रातील सर्व संत परंपरा जी आहे ती नाथपंथी आहे. परंतु आपल्याला हे फारसे माहीत नसतं. मच्छिंद्रनाथ यांचे गुरु हे प्रत्यक्ष शिव आणि दत्तगुरु. आणि दत्त संप्रदायामध्ये देखील सर्व लोक हे नाथपंथी आहेत. दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथ यांच्याच बरोबर त्यानंतरच्या नजीकच्या काळातच जालंदरनाथ यांनादेखील अनुग्रह दिला.

त्याचप्रमाणे अवधूत व नंतर परंपरेने चालत आलेले श्री स्वामी समर्थ , साई बाबा आणि शंकर महाराज हे देखील नाथपंथाचे संबंधित आहेत. दत्त गुरु हे नाथ संप्रदायाचे गुरु असल्यामुळे जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हे देखील नाथ संप्रदायाशी जवळचे मानले जातात. रामदास स्वामींचे

थोरले बंधू गंगाधरस्वामी यांना एकनाथांनी अनुग्रह दिला होता. रामदास स्वामींचे प्रत्यक्ष गुरु हे कोणीच नव्हते असे मानले जाते. परंतु जी व्यक्ती दासबोधामध्ये गुरु आणि शिष्य व त्यातील गुरूचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगते त्यांना गुरु नव्हते हे मानणे संशयास्पद आहे.

त्यामुळे कदाचित त्यांना लहानपणीच एकनाथांनी किंवा गंगाधर स्वामी यांनी अनुग्रह दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाथपंथावर भारतीय इतिहासाने फारसा अभ्यास केलेला प्रसिद्ध नाहीये. तिबेटी बुद्धांच्या ग्रंथांमध्ये त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथ आणि सहीरोबानची सिद्धांतमाला , अशा काही ग्रंथांमध्ये नाथांचा उल्लेख सापडतो. परंतु इतिहासाला ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या पद्धतीने याचा अभ्यास झालेला नाही किंवा याची फारशी माहितीही उपलब्ध नाही. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांच्या नंतरचे जे नाथपंथी होऊन गेले त्यांच्याबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते.

परंतु मुख्य नऊ नाथ म्हणजेच मच्छिंद्र, गोरक्ष, जालंदर, चरपटी, मीननाथ, नागेश, भरतरी, रेवणनाथ, कानिफनाथ,चौरंगीनाथ,अंडबंग नाथ यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. या ९ मूळ नाथान शिवाय अजून ८४ सिद्ध पुरुष हे मानले जातात. रवळनाथ, नवलोबा नाथ वगैरे जी देवळे आपण बघतो ते खरे देव नसून नाथ पांथांमधील सिद्ध होऊन गेले त्यांची नावे आहेत. नवनाथ कथासार तेव्हा असे काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते लोक वाचतातच त्यामुळे त्यातून त्यांची थोडीफार माहिती व सामर्थ्य लक्षात येते. परंतु त्या ग्रंथांमधील बऱ्याचशा गोष्टी या फक्त गोष्टी वाटतात त्यातून सत्य फार कमी कळते. त्यांच्या सामर्थ्यावर माझी कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी प्रत्यक्ष सुर्याशी लढाई केली. ही गोष्ट वाचण्यापेक्षा त्यांची खरोखर कोणाबरोबर लढाई झाली होती हे माहिती करून घ्यायला जास्त आवडेल. त्या काळातील कोणतेही इतर विरोधी शक्ती त्यांच्यासमोर टिकू शकली नाही ते कसे काय हे माहिती करून घ्यायला आवडेल. आणि नुसतेच टिकून राहिले असं नाही तर ते प्रचंड प्रसिद्ध व नावाजले गेले की त्यांच्याविरुद्ध कोणतेही वाईट गोष्ट कोणीही बोलत नाही.

प्रचंड शारीरिक म्हणजे हठ योगाची साधना , संन्यास ब्रह्मचर्य हा नाथपंथी योगी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता. नाथ पंथांमध्ये प्रवेश करण्याआधी प्रचंड शारीरिक व मानसिक साधना करून घेतल्यानंतरच अशा व्यक्तीला संन्यासदीक्षा देऊन नाथ पंथांमध्ये घेण्यात येत असे. ब्रह्मचर्य आणि वैराग्य या गोष्टींना तर गोरक्षनाथांनी अत्यंत महत्त्व दिले आहे.

आजच्या काळामध्ये आपण या गोष्टींची चेष्टा उडवत असू.परंतु या लोकांनी जे काही मिळवले आहे ते पाहता या गोष्टी चेष्टेने उडवण्या सारख्या नक्कीच नाही. हो आपण ते पालन करण्यात अयशस्वी अशी पण याचा अर्थ असा होत नाही की ते मिथ्या आहे. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, स्वतः बुद्धाचे आयुष्य, येशू ख्रिस्त या सगळ्यांच्या मतानुसार ब्रह्मचर्य आणि वैराग्य या माणसाला फार उच्च पातळी पर्यंत घेऊन जाऊ शकतात. आता इतके लोक आणि तेसुद्धा आपापल्या मार्गावरील अधिकारी आणि प्रचंड यशस्वी पूर्णतः खोटे बोलत नसावेत.

तरी यावर आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे. जवळपास सर्व भारतातील संतांचा पाया असणारे हे नऊ जण किती सामर्थ्यवान आणि किती जबरदस्त असतील याचा फक्त अंदाज बांधलेला बरा. यांनी जो संप्रदाय आणि विचार नवव्या ते दहाव्या शतकामध्ये चालू केला तो अजूनही तेवढ्याच भक्कमपणे चालू आहे. दैवी म्हणजे अजून तरी काय असले पाहिजे?

Mayur Joshi

(लेखक मयूर जोशी आयटी क्षेत्रातील आहेत. त्यांची सृजनशीलता छायाचित्रण आणि लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ट्विटरवरील त्यांच्या एका वाक्यातील लघूभयकथाही लक्षवेधी असतात.)

ट्विटरवर फॉलो करा – @mayurjoshi999


Tags: MaharashtraMayur JoshimumbaiNath Panthनाथपंथमयूर जोशी
Previous Post

एक वाढदिवस खास…मुक्या जनावरांना घास!

Next Post

लतादिदींच्या आठवणींनी प्रधानमंत्री नरेंद मोदी हळवे!

Next Post
pm modi gets emotioal by latadidi memories

लतादिदींच्या आठवणींनी प्रधानमंत्री नरेंद मोदी हळवे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!