Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. पठाण दुसरे पुष्प गुंफणार

March 19, 2021
in सरकारी बातम्या
0
Maharashtra

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेत’ २० मार्च २०२१ रोजी माजी कुलगुरु तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पठाण हे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि या काळात राज्याने विविध क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. एस.एन.पठाण हे ‘उच्च शिक्षण काल आज आणि उद्या’ या विषयावर २० मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता आपले विचार मांडणार आहेत.

महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा

  • देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन बनलेल्या महाराष्ट्राने इतर राज्यांना प्रेरणा ठरेल असे कार्य केले आहे.
  • वंचित उपेक्षित घटकांबरोबर महिला आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याने अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.
  • महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
  • कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात होत आहे.
    या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.

महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव

  • देशाची राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राची १९६१ मध्ये स्थापना झाली.
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेले हे कार्यालय केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
  • या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे.
  • राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. एस. एन. पठाण यांच्या विषयी

  • डॉ. शहाबुद्दीन नुरमहंमद तथा एस.एन. पठाण यांनी १९७७ मध्ये वनस्पती शास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून नोकरीस सुरुवात केली.
  • कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी वनस्पतीशास्त्रात पीएचडी मिळविली.
  • जर्मनी आणि जपान येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत त्यांनी शोध निबंध सादर केले.
    १९९९ ते २००५ दरम्यान राज्याचे उच्च शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
    २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु पद भूषविले.
  • त्यांच्याच काळात या विद्यापीठास ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ असे नवीन नाव देण्यात आले.
  • ‘टाकीचे घाव’ या मूळ मराठी भाषेतील त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून उर्दु, हिंदी, अरेबिक आणि इंग्रजीत भाषेतही या पुस्तकाच्या आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.
  • दै. पुण्य नगरीतून समाजसंवाद या सदरातून त्यांचे ५२ वैचारिक लेख प्रसिध्द झाले. याच लेखांचे ‘समाजसंवाद’ हे संपादीत पुस्तक प्रकाशित झाले.
  • जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या शिक्षक निवड समितीवर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
  • सध्या ते काश्मिर विद्यापिठाच्या शिक्षक निवड समितीवर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
  • डॉ. पठाण हे वर्ष २०१० पासून माईर्स एमआयटीच्या आळंदी स्थित विश्वशांती केंद्राचे धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

शनिवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार

शनिवारी २० मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi <span style=”font-size: 12.0pt; font-family: ‘Cambria’,’serif’; mso-fareast-font-family: ‘Times New Roman’; mso-bidi-font-family: ‘Times New Roman’; color: #222222; mso-fareast-language: EN-IN;” data-mce-style=”font-si


Tags: Maharashtraमहाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
Previous Post

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

Next Post

जनरल बातम्या : 1) टाटा मोटर्स कंपनीने रुग्णांची वाहतूक करणारी मॅजिक एक्स्प्रेस नावाची अँब्युलन्स लॉन्च केली आहे. कोरोना साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. इकोनॉमी अँब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली. ही मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार केली आहे.ही अँब्युलन्स एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करते. 2)सध्या बाजारात सोने अधिक स्वस्त होत आहे आणि त्यामुळेच सराफा बाजारात ही सोन्याची मागणी वाढलेली दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६३०० रुपयांवर पोहचली होती.सोने सध्या १२००० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि २०२१ च्या वर्षात सोने ६००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) शुक्रवारी बाजार बंद झाला होता त्या वेळी सोन्याचा भाव ४४७८५ रुपयांवर बंद झाला होता. त्यामध्ये ९४ रुपयांची वाढ झाली होती. त्यापूर्वी सोन्याचा ४४२७१ रुपयांपर्यंत खाली आला होता. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६८९५ रुपये होता त्यात घसरण होवून ६५० रुपये किंमत झाली.आणि त्यामुळेच चांदीने ही ६५९३३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. 3) कोराना लसीमुळे कोराना पुन्हा संपण्याच्या मार्गावर येत होता आणि यामुळेच सरकारने पुन्हा बंद पडलेल्या कामधंद्यांना काही अटी नियमंसोबत सुरुवात करण्यास परवानगी दिली होती.परंतु नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाच प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला.मध्य प्रदेशातही गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे.आणि त्यामुळे प्रशासनानं निर्बंध कठीण करण्याचा निर्णय घेतलाय.राज्यातील इंदूर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी तर मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल, असे आदेश केले आहेत.

Next Post

जनरल बातम्या : 1) टाटा मोटर्स कंपनीने रुग्णांची वाहतूक करणारी मॅजिक एक्स्प्रेस नावाची अँब्युलन्स लॉन्च केली आहे. कोरोना साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. इकोनॉमी अँब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली. ही मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार केली आहे.ही अँब्युलन्स एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करते. 2)सध्या बाजारात सोने अधिक स्वस्त होत आहे आणि त्यामुळेच सराफा बाजारात ही सोन्याची मागणी वाढलेली दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६३०० रुपयांवर पोहचली होती.सोने सध्या १२००० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि २०२१ च्या वर्षात सोने ६००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) शुक्रवारी बाजार बंद झाला होता त्या वेळी सोन्याचा भाव ४४७८५ रुपयांवर बंद झाला होता. त्यामध्ये ९४ रुपयांची वाढ झाली होती. त्यापूर्वी सोन्याचा ४४२७१ रुपयांपर्यंत खाली आला होता. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६८९५ रुपये होता त्यात घसरण होवून ६५० रुपये किंमत झाली.आणि त्यामुळेच चांदीने ही ६५९३३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. 3) कोराना लसीमुळे कोराना पुन्हा संपण्याच्या मार्गावर येत होता आणि यामुळेच सरकारने पुन्हा बंद पडलेल्या कामधंद्यांना काही अटी नियमंसोबत सुरुवात करण्यास परवानगी दिली होती.परंतु नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाच प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला.मध्य प्रदेशातही गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे.आणि त्यामुळे प्रशासनानं निर्बंध कठीण करण्याचा निर्णय घेतलाय.राज्यातील इंदूर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी तर मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल, असे आदेश केले आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!