Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’- डॉ विजया वाड

March 24, 2021
in सरकारी बातम्या
0
vijaya wad

मुक्तपीठ टीम

‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’ या पद्धतीने काम केल्याने मराठी विश्वकोश हा माहितीचा खजिना आहे. हा खजिना डिजीटल माध्यमातून जगभर पोहचल्याचे मत प्रसिध्द लेखिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर डॉ. वाड बोलत होत्या.

मराठी विश्वकोश ही माझ्या आयुष्यातील आनंददायी गोष्ट असून या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करता आल्याचे सांगत त्यांनी ५३ वर्ष रखडलेल्या विश्वकोशाचे उर्वरीत खंड पूर्ण करण्याच्या निर्मिती प्रक्रियेचा पट यावेळी उलगडला. मुख्याध्यापिका पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुंबईतील पोतदार शिक्षण संस्थेत विश्वस्तपदावर असताना डिसेंबर २००५ मध्ये विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

यानंतर विश्वकोशाचा १७ वा खंड तयार करण्यासाठी केलेला सातारा जिल्हयातील वाई येथील मुक्काम . कामाला सुरुवात केली तेव्हा नोंदी तयार होत्या पण त्या ७ वर्ष जुन्या झाल्या होत्या. त्यातील प्रत्येक नोंदीचे परिशीलन करून पावणे दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून ८८३ नोंदी पूर्ण करून सतारावा खंड पूर्ण होऊन त्याचे प्रकाशनही झाल्याचे त्यांनी सांगितले. पावणे दोन वर्षात १८ वा खंड पूर्ण केला. १९ वा खंड ही झाला या दोन्ही खंडांचे प्रकाशन झाले.

विश्वकोशाचा २० खंड परिपूर्तीचा खंड होता. मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून १२०० पानाचा खंड न काढता पूर्वाध व उत्तरार्ध असे खंड काढण्याचे ठरले. पूर्वाध झाला होता. आता फक्त ४०० नोंदी शिल्लक असताना विश्वकोश मंडळ बरखास्त झाले. अशात राज्य सरकारने उर्वरीत नोंदी पूर्ण करण्याची जबाबदारी दिली व ४ महिने वाईला तळ ठोकून हा खंड पूर्ण केले. अखेर २४ जून २०१५ ला मराठी विश्वकोशाचे अंतिम प्रकाशन झाल्याचे डॉ. वाड म्हणाल्या.

विश्वकोशाच्या संगणकीकरणाची वाटचाल

२०११ मध्ये विश्वकोश संगणकीकरणाची घोषणा केली. सीडॅक या पुण्याच्या संस्थेत ११ महिन्यात टाईपींगचे कार्य पूर्ण झाले आणि विश्वकोश डिजीटल झाला. तत्पूर्वी ८ मार्च २००७ ला मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळ तयार केले. नंतर विश्वकोश ६ सिडी संच स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. वाड यांनी सांगितले. विश्वकोशाविषयी जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील १८० ठिकाणी वाचन स्पर्धांचे आयोजन व त्यातील अनुभवही त्यांनी कथन केले.

२० व्या खंडाच्या विज्ञान विभागाच्या ८ दीर्घ नोंदी पूर्ण करण्यात प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या मदतीने ४ महिन्यात पूर्ण झालेल्या नोंदी तसेच ‘कुमारकोश’ तयार करताना जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सूचनेतून तयार झालेल्या दोन रंगीत पानांच्या पर्यावरण खंडाची रोचक माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘मराठीच्या वैभवाचा मानकरी विश्वकोश’ हे विश्वकोशाचे गीत २०११ मध्ये तयार झाले. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायले तर प्रसिध्द संगीतकार अशोक पत्की यांनी या गीतास संगीत दिले आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी ते अभिनीत केल्याचे त्यांनी सांगितले.

डिजीटल विश्वकोशाच्या कामगिरीसही कौतुकाची थाप मिळाली या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मंथनचे आशियाई मानांकन मिळाले. विश्वकोशाच्या डिजीटल स्वरूपामुळे १५ लाख वाचक आणि १०५ देशात विश्वकोश वाचला गेला हा समाधनाचा भावही डॉ वाड यांनी व्यक्त केला.

 


Tags: Dr. Vijaya Wadडॉ. विजया वाडमराठी विश्वकोश मंडळमहाराष्ट्र राज्य
Previous Post

गुन्हे महत्वाचे : 1) एकाच कुटुंबाती तीन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यावर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 2)बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केली. विद्यार्थ्याला बेड्या ठोकण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घाबरवण्यासाठी बिलंदर आरोपीने त्यांच्यावर कुत्रे सोडले. 3)नांदेडमधील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या न्यायालयाने 64 दिवसांत शिक्षा सुनावली आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेला पळवून नेऊन अत्याचार करत खून केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. 4) एका महिलेची रात्रीच्या सूमारास धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. दोन दिवसात या हत्येचा उलगडा करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलं आहे. एका तरुणाचे या महिलेच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेने या प्रेम सबंधास विरोध केल्याने या तरुणाने या महिलेची गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या कटात अल्पवयीन मुलगी देखील सहभागी होती. दिलजीत यादव असं या आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर जन्मदात्या आईच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 वर्षीय मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 5)पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहाणाऱ्या सागर चौधरी (२८) या विवाहित तरुणाने प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सागरने आत्महत्येपूर्वी प्रेयसीला व्हॉटसअॅपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज केल्याचे तपासात आढळले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी सुष्मिता यादव या तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Next Post

अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी

Next Post
swabhimani shetari sanghatana

अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!