Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईच्या धारावीतील दहशतवादी दिल्ली पोलिसांनी कसा पकडला?

मुंबई पोलिसांना जमलं नाही, दिल्ली पोलिसांनाच का जमले, त्याची समजून घ्या कारणं...

September 15, 2021
in featured, Trending, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Jan mohhmed ATS delhi police

मुक्तपीठ टीम

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावल्यानंतर त्यातील एक आरोपी जान महंमद हा मुंबईतील धारावीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना याबद्दल काहीच माहिती का नव्हते, असा आक्षेप घेतला गेला. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी त्याबद्दल बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जान महंमद अली महंमद शेखचे पाकिस्तानातील डी कंपनीशी संबंध आहेत. हा आरोपी पाकिस्तानातील डी कंपनीच्या संपर्कात असल्याचे वीस वर्षांपूर्वीचेही अनेक रेकॉर्ड आहेत. पण यावेळी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून कटाची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे त्यांनी कारवाई केली. जान महंमदबद्दल महाराष्ट्र एटीएसने दिल्ली पोलिसांना माहिती कळवली आहे.

 

महाराष्ट्र एटीएसचं काय म्हणणं?

  • महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईतील अटक मुंबईतील आरोपीबद्दल माहिती उघड केली आहे.
  • दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे.
  • त्याचं नाव जान महंमद अली मोहम्मद शेख असं आहे.
  • त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत.
  • जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे.
  • आमच्या नजरेत तो होताच.
  • पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती.
  • ती सेंट्रल एजन्सीकडे होती.
  • त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती.

 

 

जानचा मुंबई ते कोटा प्रवास

    • जान महंमद शेखने ९ सप्टेंबरला जाण्याचं ठरवलं होतं.
    • त्यानुसार त्याने १० तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कन्फॉर्म होत नव्हतं.
    • तर त्याने १३ तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं तिकीट मिळवलं.
    • त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेला रवाना झाला.
    • प्रवासादरम्यान तो राजस्थानातील कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ शस्त्र किंवा स्फोटकं मिळाली नाही.
    • महाराष्ट्र एटीएसची एक टीम दिल्लीला जाणार आहे.

 

मुक्तपीठ भूमिका – तुळशीदास भोईटे

  • दहशतवादी कटाबद्दल केंद्रीय यंत्रणाच पुरवतात माहिती
  • देशात घडणाऱ्या दहशतवादी घातपाती कारवायांवर लक्ष ठेवण्याची खास जबाबदारी ही आयबी, रॉ, मिलिटरी इंटलिजन्स या केंद्रीय यंत्रणांवर असते.
  • त्यातही आयबी ही जास्त महत्वाची भूमिका पार पाडते.
  • त्यासाठी या यंत्रणा जगभरातील नेटवर्क तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स वापरतात.
  • जगभरातील मित्र देशांच्या एजेंसीही त्यांच्याकडे येणारे इनपुट हे या सेंट्रल एजेंसींला पुरवतात.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार ते राज्य पोलिसांना पुरवले जाते.
  • बहुतांश दहशतवादी प्रकरणांमध्ये कारवाई करणारे हात हे स्थानिक पोलिसांचे असले तरी माहिती देणारे डोके मात्र केंद्रीय यंत्रणांचेच असते.
  • अनेकदा दिली गेलेली माहिती ही खूपच अस्पष्ट असल्याने नेमकं लक्ष्य कळत नसल्याने स्थानिक पोलिसांची कारवाई फसते किंवा घातपात घडवण्यात दहशतवादी यशस्वी होतात. अशावेळी खापर मात्र अस्पष्ट माहिती देणाऱ्यांवर न फुटता त्या-त्या राज्यातील स्थानिक पोलिसांवर फोडले जाते.
  • पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवादी प्रशिक्षणासाठीच जाऊच कसे शकले, असा प्रश्न केंद्र सरकारला विचारणे अपरिपक्वतेचे ठरेल तसेच मुंबईच्या धारावीतील आरोपी महाराष्ट्र किंवा मुंबई पोलिसांना कसा पकडता आला नाही, किंवा उत्तरप्रदेशातील आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांना का पकडता आले नाहीत, असे विचारणेही अपरिपक्वतेचे ठरेल.

Tags: delhi policejan Mohmmedmumbai policeterrorist
Previous Post

“मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, त्यांच्याविरोधात आंदोलन करा!”

Next Post

राज्यात ३,७८३  नवे रुग्ण, ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी! मुंबईत ५१५!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ३,७८३  नवे रुग्ण, ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी! मुंबईत ५१५!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!