Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल”: गुलाबराव पाटील

June 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
gulabrao patil

मुक्तपीठ टीम

स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. या शिकवणीस अनुसरून ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल असा विश्वास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत तालुका स्तरावरील गट समन्वयक व समूह समन्वयक यांचेकरिता गावपातळीवरील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा – क्षमता बांधणी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

टोल फ्री क्रमांक व नियंत्रण कक्ष स्थापन करावा

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्याने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये राज्यात घ्यावयाच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांबरोबरच राज्यातील २२ हजार १७३ गावांचा कृती आराखड्यात समावेश असून त्या गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कामे करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात टोल फ्री क्रमांक व नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. प्लास्टिक व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन या घटकांवरही काम करावे अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,पंचायत समिती सभापती व सरपंच या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या कामात आपला सक्रिय सहभाग दिल्यास महाराष्ट्रात स्वच्छ – सुंदर गावे निर्माण होतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

gulabrao patil

यावेळी युनिसेफचे वॉश ऑफिसर युसुफ कबीर यांनी यावेळी प्रकल्प व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या.

 

अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे म्हणाले, गावांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावेत. गाव फेरी, शिवार फेरी काढून गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्या आराखड्यात येतील यादृष्टीने गट समन्वयक व समूह समन्वयक यांनी काम करावे.

सहसचिव अभय महाजन म्हणाले, गटसमन्वयक,समूह समन्वयक यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गटचर्चा तसेच विविध समित्यांच्या सदस्यांबरोबर चर्चा करून आदर्श आराखडे तयार होतील असे नियोजन करावे.

 

या उद्घाटन कार्यक्रमाला कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार लताताई सोनवणे, आमदार कैलास पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार संतोष बांगर, आमदार अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील अधिकारी व कर्मचारी दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा कळविल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले.

 

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – २ या कार्यक्रमांतर्गत राज्यातील २२ हजार १७३ गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांसह कंपोस्ट खड्डे, गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प , मैला व्यवस्थापन, गावागावांतून कचराकुंड्याद्वारे व घराघरांतून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण, प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन, पुर्नवापर, पुर्नवर्गीकरण यासह सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत व्यक्तिगत / सार्वजनिक शोषखड्डा / परसबाग सार्वजनिक पाझरखड्डे, सांडपाणी शुध्दीकरण करण्याची प्रक्रिया व पुर्नवापर, कमी खर्चाचे जल निस्सारण अनुषंगिक नाली व छोटया पाईपची वहन व्यवस्था आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत. गाव पातळीवरील स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व ग्रामसेवक यांच्या मदतीने गावांचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.


Tags: asha workerआशा वर्करकृषिमंत्री दादाजी भुसेखासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

“आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे?”

Next Post

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी एल्गार, प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार

Next Post
prakash ambedkar

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी एल्गार, प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!