Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एक्झिट पोलचे अंदाज नसतात नेहमीच अचूक! जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे ठरले होते चुकीचे…

December 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
voting

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुका २०२२साठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अनेक सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जारी केले आहेत. त्यानुसार, गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे सर्व सर्वेक्षणांनी म्हटले आहे. काही सर्वेक्षणांमध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेसला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, एक्झिट पोलचे अंदाज हे नेहमीच अचूक नसतात. अनेक वेळा असेही घडले आहे जेव्हा एक्झिट पोलचे दावे खोटे ठरतात.

एक्झिट पोलचे दावे कधी, कुठे आणि केव्हा खोटे आणि खरे ठरले हे जाणून घ्या…

  • २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे तर, या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल अयशस्वी ठरले होते.
  • या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकून नवा विक्रम रचला.
  • तर, भाजपच्या ३ जागांवर घट झाली. तर काँग्रेसचे खातेही उघडले नाही.
  •  तसेच, २०२०च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल बरोबर सिद्ध झाले होते.
  • २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही अनेक एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले होते.
  • निवडणुकीच्या निकालापूर्वी अनेक वाहिन्या आणि एजन्सींनी बिहारमध्ये महाआघाडी म्हणजेच आरजेडी-काँग्रेस आघाडी सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला होता, परंतु, निवडणुकीचे निकाल येताच बिहारमध्ये जेडीयू-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले.
  • २०१७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही बहुतांश एक्झिट पोल चुकीचे ठरले.
  • निवडणूक निकालात भाजप बहुमताच्या जवळपास पोहोचू शकेल असा दावा अनेक एजन्सींनी केला होता. पण, निकाल आल्यावर भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळाले.

पश्चिम बंगाल २०२१च्या निवडणुकीत उतार-चढाव!

  • २०२१मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये बरेच चढ-उतार दिसले.
  • बंगालच्या निवडणुकीत अनेक यंत्रणांनी भाजपला बहुमत दिले होते.
  • काही वृत्तसंस्थांनी भाजपला १४७ जागा आणि टीएमसी १४३ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. तर एका एका टीव्ही एजन्सीने भाजपला १९२ जागा जिंकल्याचा दावा केला होता. पण, निकाल आल्यावर एक्झिट पोल अयशस्वी ठरले आणि भाजपच्या ७७ जागा कमी झाल्या. तर, टीएमसीने पुन्हा सरकार स्थापन केले.

हरियाणा विधानसभा निवडणूक २०१९मधील सर्वेक्षणापेक्षा वेगळा निकाल

२०१९ हरियाणा विधानसभा निवडणुकीत, निकालाच्या दिवशी, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, बहुतेक वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षणांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे दिसून आले. मात्र, राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपला प्रचंड बहुमत मिळत असल्याचा दावा पोलमध्ये करण्यात आला होता, जो चुकीचा ठरला आणि काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावाही करण्यात आला, मात्र याउलट काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळवता आला.

नवी दिल्लीत मनपात एक्झिट पोल खरे ठरले!

नवी दिल्लीतील चार मनपांचं एकत्रिकरण करून भाजपाने एक मोठी मनपा तयार केली. आधीच्या मनपांमध्ये भाजपाची सत्ता होती. या मोठ्या एकत्रित मनपामध्ये आपचा विजय होईल, भाजपाला सत्ता गमवावी लागेल, असे अंदाज एक्झिट पोल्समध्ये व्यक्त झाले होते. ते आज खरे ठरले. आपने राज्याच्या सत्तेप्रमाणेच मनपाचीही सत्ता गमावली.


Tags: electionsExit PollsGujarat Assembly ElectionsHimachal Pradesh Assembly Electionsmuktpeethएक्झिट पोलगुजरात विधानसभा निवडणुकाघडलं-बिघडलंनिवडणुकामुक्तपीठहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक
Previous Post

‘कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये’ – छगन भुजबळ

Next Post

सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला?

Next Post
keshav Upadhye

सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!