Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आसाममध्ये पुराचा हाहाकार: का नेहमीच ब्रह्मपुत्रा कोपते?

June 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Assam flood

मुक्तपीठ टीम

आसामला दरवर्षी पावसाळ्यात पूराचा फटका बसतोच. आसामचे पूरामुळे अतिशय नुकसान होते. पुरामुळे आसाममधील परिस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांतील १९ लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, होजई, नलबारी, बजाली, धुबरी, कामरूप, कोक्राझार आणि सोनितपूर जिल्ह्यात मृत्य लोकांची संख्या नोंदवली गेली आहेत. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे २ हजार ९३० गावे पाण्यात बुडाली.

आसाममधील पुरामुले ४३,३३८.३९ हेक्टर पीक जमीनही पाण्याखाली गेली आहे. तसेच ४१० जनावरं वाहून गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. सध्या १ लाख ०८ हजार १०४ पूरग्रस्त लोक ३७३ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. दिमा हासाओ, गोलपारा, मोरीगाव, कामरूप आणि कामरूप महानगर जिल्ह्यात भूस्खलनाची नोंद झाली आहे.

आसाममधील पुराची कारणे:

  • आसाममधील नद्यांच्या वरच्या भागात अनेक धरणे बांधण्यात आली आहेत. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने काही धरणेही बांधली आहेत. या धरणांमधून अनियमित पाणी सोडल्याने मैदानी भागात पूरस्थिती निर्माण होते.
  • आसामचा भूभाग हा काहीसा खोल आहे. आजूबाजूच्या सर्व भागात पाण्याचा साठा वाढला की प्रवाहाचा मार्ग फक्त आसामच्या दिशेने जातो.
  • आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये भूस्खलन होतं राहतं,
  • भूस्खलन आणि भूकंपांमुळे नदीपात्रात गाळ साचतो. नदीचे पात्र गाळानं भरतं. त्यामुळे नद्यांची पाणी प्रवाह क्षमता कमी होते. ते पात्राबाहेर होतो.
  • ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या वेगवान प्रवाहामुळे धूप होऊन किनारपट्टीच्या जमिनी नष्ट होतात. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाची धूप झाल्यामुळे या खोऱ्याची रुंदी १५ किमी पर्यंत वाढली आहे.

धरणे बांधणे:

अतिक्रमणाचाही बसतो फटका!

  • पर्यावरणीय वनजमीन आणि पाणवठ्यांवरील अतिक्रमणामुळेही राज्यात पूर येतो.
  • ओलसर जमीन जास्त प्रमाणात पाणी शोषून घेते, परंतु त्यांच्या घटत्या संख्येमुळे पुराची परिणामकारकता वाढली आहे.

पूररोधी उपाययोजनेत गंभीरतेचा अभाव :

राज्यातील भीषण पूरस्थिती लक्षात घेऊन ब्रह्मपुत्रा नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, त्याची अंमलबजावणी होण्यास सातत्याने विलंब होत आहे.


Tags: assamBrahmaputra riverFlood hitmuktpeethआसामघडलं-बिघडलंपुराचा फटकाब्रह्मपुत्रा नदीमुक्तपीठ
Previous Post

२८ रुपयांमुळे रिक्षा उलटून मृत्यू, ६ वर्षांनंतर ४३ लाखांची भरपाई! वाचा संघर्ष…

Next Post

राज्यात ४००४ नवे रुग्ण, ३०८५ बरे! मुंबई २०८७, पुणे ३९२, ठाणे ८५१

Next Post
Corona

राज्यात ४००४ नवे रुग्ण, ३०८५ बरे! मुंबई २०८७, पुणे ३९२, ठाणे ८५१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!