Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“सावित्रीबाई व ज्योतिरावांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही”

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; बंधुता साहित्य परिषदेतर्फे 'राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार' प्रदान

November 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
बंधुता साहित्य परिषद

मुक्तपीठ टीम

 “सावित्रीबाई व महात्मा फुले यांची लढाई ब्राह्मण समाजविरोधात नव्हती, तर प्रत्येक समाजातील ब्राह्मण्याविरोधात होती. बहुजन, अभिजन अशा सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य दडलेले आहे. हा ब्राह्मण्यवाद संपवण्यासाठी फुले दाम्पत्याचा विचार आपण अमलात आणला पाहिजे. सावित्रीबाई ही महात्म्याची महात्मा आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
बंधुता साहित्य परिषद
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वतीने पहिला ‘राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री ललिता आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात आला. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवनमध्ये झालेल्या सोहळ्याला बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.
बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील १५ महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यात वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), सरिता पवार (सिंधुदुर्ग), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांचा समावेश होता.
बंधुता साहित्य परिषद
जातीचे मेळावे जोरात चालू असताना बंधुतेची ज्योत तेवत आहे, याचे समाधान आहे. लोकांकडून मिळणारा मान सन्मान मन भारावून टाकतो, अशी भावना सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. डॉ. सबनीस म्हणाले, “लेखक, शिक्षक, शेतकऱ्यांचा कैवारी, समाजसुधारक, क्रांतिकारक, बहुजनांचा वाली असलेल्या फुले यांचा विचार अंगिकारण्याची गरज आहे. सगळे ब्राह्मण वाईट आणि सगळे बहुजन चांगले असे नाही. फुले यांना सर्वच समाजातील, जातीतील चांगल्या लोकांची साथ लाभली.”
चंद्रकांत दळवी म्हणाले, “आपापल्या जातीतील ब्राह्मण्य निर्मूलन करण्याची गरज आहे. समाजात बंधुत्वाची भावना रुजली पाहिजे. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे परखड विचार समाजाला आरसा दाखवणारे आहेत. त्यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे जीवनात नेमके काय करायचे, याची दिशा मिळते. त्यांना बंधुतेच्या विचारपीठावर आणून रोकडे यांनी समाजासमोर आदर्श दाम्पत्याचा सन्मान केला आहे. त्यांचा सन्मान माझ्या हस्ते होणे हा माझाही बहुमान आहे.”
बंधुता साहित्य परिषद
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “आपल्या अवतीभवती अनेक चांगली माणसे आहेत. त्यांना शोधण्याची दृष्टी आपल्या अंगी असावी. फुले यांनी केलेल्या कार्यातून, दिलेल्या विचारांतून प्रेरणा घेऊन काम करण्याची गरज आहे. उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी चांगलेपणात अधिक भर घालावी लागेल. त्यासाठी बंधुतेचा विचार जनमानसात रुजायला हवा.” चंद्रकांत वानखेडे यांनी काव्यात्मक मनोगत व्यक्त केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजूरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले.

Tags: National Savitrijoti AwardRashtriya Bandhuta Sahitya ParishadShripal Sabnisबंधुता साहित्य परिषदराष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कारश्रीपाल सबनीस
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’: प्रदूषणावर मात करणारे एअर फिल्टर शोधणाऱ्या मयूर पाटीलशीही केली चर्चा

Next Post

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३ चे आयोजन

Next Post
Ankanaad

'अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३ चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!