Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कार्यकर्त्यांची अशीही एक जमात…#निवेदनजीवी

June 5, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
dilip dalimkar

दिलीप नारायणराव डाळीमकर/ व्हाअभिव्यक्त

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष,पदाधिकारी सरकारी कार्यालयात निवेदन देतांना आपण बघत असतो. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपणच कसे प्रयत्नशील आहोत हे दाखविण्यासाठी बातम्या वर्तमानपत्र, सोशल मीडियावर रंगविल्या जातात. निवेदन किंवा सरकारी कार्यालयात जनतेच्या प्रश्नासाठी अर्ज केल्याचे फोटो हे नेते कार्यकर्ते प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडियावर व्हायरल करत असतात.

 

एखादा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज करणे,निवेदन देणे हा प्रश्न सोडविण्यासाठीचा एक छोटासा भाग.नागरी समस्यांबाबत निवेदन देणे हे सोपे आहे.पण ती नागरी समस्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे हे त्यामानाने खूप कठीण व कष्टाचे काम.

 

निवेदन देणारे कार्यकर्ते व नेते दोन प्रकारचे असतात.

१) निवेदन देऊन त्याचा सतत प्रामाणिकपणे पाठपुरावा करुन प्रश्न सोडविणारे
२)निवेदन देऊन त्याची मीडियात जाहिरात करणारे व प्रत्यक्षात त्या प्रश्नांचा पाठवपुरावा न करणारे.

 

पहिल्या प्रकारचे नेते हे सच्चे समाजसेवक तर दुसऱ्या प्रकारच्या नेते, कार्यकर्त्यांबद्दल निवेदनजीवी हा शब्द वापरणे संयुक्तिक ठरेल.निवेदनजीवी राजकीय व सामाजिक नेते, कार्यकर्ते फक्त सरकारी कार्यालयात निवेदन देऊन फोटो व त्याचे फोटो झळकवून मोकळे होतात.

 

कोणतीही नागरी समस्या सोडविताना त्या समस्येविषयीचे संपूर्ण ज्ञान निवेदन देणाऱ्याला असले पाहिजे. विषयाची सखोल माहिती नसेल व त्या संबधी ज्ञान नसेल तर फक्त निवेदन देऊन प्रश्न सुटण्याची शक्यता कमीच असते.

 

माझ्या वैयक्तिक अनुभव असा आहे की फक्त अर्ज करून, निवेदन देऊन कधीही समस्या सुटत नसतात तर त्यासाठी योग्यरितीने पाठपुरावा करणे गरजेचे असते. बरेच लोक निवेदन दिल्यानंतर लगेच आंदोलन, उपोषण हे मार्ग निवडतात.

 

वस्तुस्थितीचा विचार केला तर निवेदन दिल्यानंतर सरकारी विभागाला त्या समस्यांचा जाणून घेण्यास व त्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे.

 

सरकारकडे एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची एक पद्धत आहे. सुरुवातीला निवेदन दिल्यानंतर संबंधित विभागाला स्मरण पत्र द्यावे. संबंधित विभागाच्या अधिकार्यकडून दखल घेतली जात नसेल, तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागावी त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नसेल, तर आंदोलनाचा मार्ग पत्करवा.

 

बऱ्याच वेळा असे दिसून येते की एक निवेदन दिल्यानंतर, थेट उपोषणाचे आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रश्नाची दखल घेण्यास पुरेसा अवधी न देता आंदोलनाची घाई करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या प्रश्नाचे श्रेय अन्य कोणाला जाऊ द्यायचे नसते. त्यामुळे किरकोळ प्रश्नांवरही ते आंदोलन करतात. गंभीर प्रश्नांबाबत मात्र कोणीही पुढे येताना दिसत नाही.

 

खरंच जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे असतील तर चमकोगिरी न करता अर्ज केल्यानंतर किंवा तक्रार दाखल केल्यानंतर सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा नियमितपणे करणे गरजेचे असते. हे करत असतांना लोकांनी लोकप्रतिनिधी असो वा सरकारी अधिकारी यांचेशी बोलतांना नम्र भाषा ठेवली पाहिजे. जनतेने लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांना शिवीगाळ करून कधीही समस्या सुटत नसतात.

 

प्रश्न सोडविण्यासाठी वेळ हा कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. काही कामे एका दिवसात होण्यासारखे असतात काहींना महिने तर काही कामाला वर्ष सुद्धा लागू शकते.

 

जनतेच्या अनेक समस्यांवर काम करत असतानाच माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की निवेदन दिल्यानंतर जर पूर्ण ताकदीने व नियमितपणे त्या प्रश्नचा पाठपुरावा केला तरच तो प्रश्न सुटतो.

 

जनतेच्या समस्या खरच प्रामाणिकपणे सोडवायचा असतील त्यासाठी पाठपुरावा करण्याची खरंच गरज आहे. तीच आपणाकडून अपेक्षा.

 

dilip dalimkar

(शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन)


Tags: #निवेदनजीवीsocial mediaदिलीप नारायणराव डाळीमक
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

इस्लामचा पर्यावरणविषयक व्यापक दृष्टिकोन

Next Post
Nature Flower 5-6-21

इस्लामचा पर्यावरणविषयक व्यापक दृष्टिकोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!