Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतात २०१५ ते २०२२ पर्यंतचे हवामानातील असंतुलन… काय आहेत याचे परिणाम?

November 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं, निसर्ग
0
Climate imbalance

मुक्तपीठ टीम

जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचा सामना हा प्रत्येकालाच करावा लागत आहे. कुठेना कुठे या सर्वाला कारणीभूतही मानवच आहे. भारतातही हवामानात झालेला बिघड पाहायला मिळतो. या वर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यांत देशभरात मुसळधार ते अतिशय मुसळधार आणि अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली. ज्यामध्ये आसामला सर्वाधिक फटका बसला. विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात आली. यामुळे जमिनीच्या तापमानात वाढ झाली. २०१५ ते २०२२ या ८ वर्षांतील तापमान सर्वात उष्ण असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवामान बदलाच्या परिणामांमुळे भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येचे जीवनमान खालावलेले असू शकते.

जागतिक हवामान संघटनेचा हवामानातील असंतुलनाचा अहवाल!

  • जागतिक हवामान संघटना अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, २०२२ मध्ये जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक च्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सिअस जास्त असेल.
  • समुद्र पातळी वाढीचा दर १९९३ पासून दुप्पट झाला आहे आणि जानेवारी २०२० पासून सुमारे १० मिलीमीटरने वाढून या वर्षी नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्ये…

  • जागतिक तापमानवाढीचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्ये दिसून येत आहे.
  • मार्च आणि एप्रिल हे पाकिस्तानमध्ये सर्वाधिक उष्ण होते.
  • जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.
  • भारतानेही पावसाळ्यात, विशेषत: जूनमध्ये ईशान्य भागात पूर अनुभवला.

ग्लोबल वॉर्मिंगचा होणारा परिणाम

  • ग्लोबल वॉर्मिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जनात वाढ. त्यामुळे हवा गरम होत असून, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.
  • ओझोनला छिद्र पडले, यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले या सर्वाचा परिणाम देशातील जलस्त्रोत, शेती, पर्यावरण आणि हवामानावर झाला.
  • यामुळे चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनासारख्या घटना वाढत आहेत.
  • कमालीचा उष्मा वाढल्याने दुष्काळाचा धोकाही वाढत आहे. . जंगलात आगीसारख्या घटना वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम अलीकडच्या काळात भारत, पाकिस्तान तसेच ब्रिटनमध्ये दिसून येत आहे.

तीव्र उष्णता असलेल्या वर्षांत २०२२चीही नोंद!

  • २०२२ मध्ये आतापर्यंतचे जागतिक सरासरी तापमान १८५०-१९०० च्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सिअस जास्त आहे.
  • जर असेच वर्षाच्या अखेरीपर्यंत चालू राहिले, तर २०२२ हे रेकॉर्डवर पाचवे किंवा सहावे सर्वात उष्ण वर्ष म्हणून रँक केले जाईल.
  • २०१५ ते २०२२ रेकॉर्डवरील आठ सर्वात उष्ण वर्षे असण्याची अपेक्षा आहे.

Tags: Climate imbalanceGlobal WarmingIndiamuktpeethnatureWorld Meteorological Organizationग्लोबल वॉर्मिंगघडलं-बिघडलंजागतिक हवामान संघटनानिसर्गभारतमुक्तपीठहवामान असंतुलनहवामानातील असंतुलन
Previous Post

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते! : राहुल गांधी

Next Post

उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरणासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणीचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Next Post
HON CM NAGAR

उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरणासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणीचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!