Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जलजीवन मिशनला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १,६६७ कोटी रुपये निधी जारी

December 5, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
जल जीवन मिशन

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला १,६६६.६४ कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. जलजीवन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्याला २०२१-२२ साठी ७,०६४.४१ कोटी रुपये निधी केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात आला असून २०२०-२१ मध्ये देण्यात आलेल्या निधीच्या जवळपास चौपट आहे.

 

राज्यात १४२.३६ लाख ग्रामीण कुटुंबे आहेत, त्यापैकी ९६.४६ लाख कुटुंबांकडे (६७.७६%) नळ जोडणी आहे. २०२१-२२ मध्ये, राज्याने २७.४५ लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखली आहे.

 

केंद्र सरकारने जल जीवन अभियानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मागील वर्षाच्या २३,०२२ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ९२,३०९ कोटी रुपयांची मोठ्या प्रमाणात केलेली तरतूद यातून हे स्पष्ट होते.

 

तसेच २०२१-२२ मध्ये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था/पंचायत राज संस्थांना पाणी आणि स्वच्छतेसाठी १५ व्या वित्त आयोगाचे अनुदान म्हणून २,५८४ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत आणि पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे २०२५-२६ पर्यंत १३,६२८ कोटी रुपयांचा निश्चित निधी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थासाठी उपलब्ध आहे. .जल जीवन मिशन ‘बॉटम- अप’ म्हणजे खालच्या स्तरापासून वरपर्यंत अशा दृष्टिकोनानुसार विकेंद्रित पध्दतीने राबवले जाते, ज्यामध्ये स्थानिक ग्रामीण समुदाय नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत आणि व्यवस्थापनापासून परिचालन आणि देखभालीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

 

महाराष्ट्राने या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी २.७४ लाख संबंधित व्यक्तींची क्षमता तयार करण्याचे नियोजन केले आहे ज्यात सरकारी अधिकारी, आयएसए , अभियंते, ग्रामीण पाणी आणि स्वच्छता समिती, देखरेख समिती आणि पंचायत सदस्यांचा समावेश आहे. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सुमारे ४.१५ लाख लोकांना प्रशिक्षित केले जाईल.

 

महाराष्ट्रात पाण्याची चाचणी करणाऱ्या १७७ प्रयोगशाळा आहेत. सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्यासाठी, माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी, हात धुण्यासाठी आणि शौचालयात वापरण्यासाठी नळाद्वारे पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत, महाराष्ट्रातील ७२,०३२ शाळा (84%) आणि ७३,३७७ (८०%) अंगणवाडी केंद्रांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

 

२०२४ पर्यंत महाराष्ट्राचे ‘हर घर जल’ राज्य बनण्याचे उद्दिष्ट आहे.


Tags: Anganwadi Kendracentral GovernmentJaljeevan MissionMaharashtraअंगणवाडी केंद्रकेंद्र सरकारजलजीवन मिशनमहाराष्ट्रहर घर जल
Previous Post

महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग

Next Post

पॅन कार्डवरील खराब अस्पष्ट छायाचित्र कसं बदलायचं?

Next Post
Pancard

पॅन कार्डवरील खराब अस्पष्ट छायाचित्र कसं बदलायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!