Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

हिमाचलच्या शेतकऱ्याची कमाल, महाराष्ट्रातही सफरचंद लागवड शक्य

June 2, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Hariman sharma

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेशातील शेतकरी हरिमन शर्मा यांनी स्व-परागण करणारे सफरचंदाचे एक कलम विकसित केले आहे. या कलमाला फुल येण्यासाठी आणि फळे लागण्यासाठी थंड वातावरणाची गरज भासत नाही. त्यांनी तयार केलेले सफरचंदाचे कलम भारतातील विविध मैदानी प्रदेश, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड शक्य असणार आहे. अगदी महाराष्ट्रासारख्या उन्हाळ्यात तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचणाऱ्या राज्यांमध्येही या सफरचंदाची लागवड शक्य आहे. काही राज्यांमध्ये तर सुरुही झाली आहे.

 

मणिपूर, जम्मू, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगणातील सखल भागांमध्ये या प्रकारच्या सफरचंदांच्या कलमांची व्यावसायिक लागवड सुरू झाली आहे. आतापर्यंत या सफरचंदाच्या कलमांची लागवड २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील पानियाला या गावचे शेतकरी हरिमन शर्मा यांनी, एचआरएमएन ९९, हे सफरचंदाचे कलम विकसित केले आहे. हरिमन शर्मा यांनी केवळ परिसरातीलच नव्हे तर अनेक राज्यातील इतर डोंगराळ जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना मदत केली आहे. ते शेतकऱ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत बनले आहेत कारण, जे लोक यापूर्वी कधीही सफरचंदाची शेती करण्याचे स्वप्नही पाहू शकत नव्हते त्यांना ही शेती करणे शक्य झाले आहे.

 

लहानपणीच अनाथ झालेल्या हरिमन यांना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले आणि त्यांचे पालनपोषण केले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांनी शेतीत स्वत: ला झोकून दिले. हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. बागायती लागवडीची आवड असल्यामुळे ते सफरचंद, आंबा, डाळिंब, किव्ही, मनुका, जर्दाळू आणि कॉफी अशी विविध पिके त्यांच्या शेतात घेतात. त्यांच्या लागवडीतील सर्वात वेगळेपण असे की ते एकाच शेतात आंब्याबरोबर सफरचंद पिकवू शकतात. शेतकरी हिमाचल प्रदेशाव्यतिरिक्त इतरत्रही सफरचंदाची लागवड करू शकतात.

 

१९९८ मध्ये हरिमन शर्मा यांनी बिलासपूरच्या घुमारवी गावातून काही सफरचंद खरेदी केले आणि बिया आपल्या घराच्या मागील बाजूस फेकून दिल्या. १९९९ मध्ये, त्यांना घराच्या मागील अंगणात एक सफरचंदाचे रोप उगवलेले दिसले, जे त्याने मागील वर्षी फेकलेल्या बियांपासून उगवले होते. फलोत्पादनात रस असणारा प्रायोगिक शेतकरी असल्याने त्यांना हे लक्षात आले की, समुद्रसपाटीपासून १८०० फूट अंतरावर पानियालासारख्या उबदार ठिकाणी उगवणारे सफरचंदाचे हे कलम वेगळे आहे. एका वर्षानंतर, रोप बहरण्यास सुरुवात झाली आणि २००१ मध्ये त्याला फळे आली. त्यांनी त्या कलमाला “मदर प्लांट” म्हणून जपले आणि त्यावर प्रयोग करण्यास सुरवात केली. २००५ पर्यंत सफरचंदच्या झाडाची एक छोटी बाग तयार केली, ज्याला अजूनही फळे येत आहेत.

 

२००७ ते २०१२ पर्यंत हरिमनने इतर ठिकाणी प्रवास केला आणि आपल्या वाणाचा प्रचार केली. इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला, की थंड वातावरण नसतानाही सफरचंद उगवणे आता शक्य आहे. तसेच, त्यावेळी सफरचंदांच्या या विविध प्रकाराविषयी संशोधन व प्रसारामध्ये फारसा रस नव्हता. अखेर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ) या स्वायत्त संस्थेद्वारे, सफरचंदाच्याच्या या नवीन जातीची दखल घेण्यात आली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Maharashtraनॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनमहाराष्ट्रहरिमन शर्माहिमाचल प्रदेश
Previous Post

“मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पँकेज द्या”

Next Post

गडचिरोलीत आदिवासी महिलांसाठी आधुनिक ‘मासिक गृह’

Next Post
period home

गडचिरोलीत आदिवासी महिलांसाठी आधुनिक 'मासिक गृह'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!