Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लंचब्रेकमध्ये ‘तो’ फोन…नंतरच कृषिमंत्र्यांचा कृषी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव!

 २२ जानेवारीला होणार पुढील बारावी बैठक

January 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer protest

मुक्तपीठ टीम

 

शेतकरी दिल्ली सीमेवर नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलकांसोबत झालेल्या अकराव्या बैठकीत केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी संघटनांच्या समोर ठेवला आहे. पण हा प्रस्ताव आधी नव्हता. हा प्रस्ताव लंचब्रेकनंतर सरकारतर्फे ठेवण्यात आला. लंचब्रेकमध्ये कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शाहांशी बोलणे केले. त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कृषि कायदे स्थगितीचा प्रस्ताव ठेवला.

 

सरकारने कायदे स्थगितीची प्रस्ताव ठेवतानाच किमान हमी दरासाठी एक समिती स्थापन करण्याचाही प्रस्ताव ठेवला. या समितीच्या शिफारशीनंतरच कायद्यांबद्दलचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

 

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. कायदे मागे घेण्यावर शेतकरी नेते ठाम आहेत. मात्र, आजवर ताठर भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारने काहीशी तडजोडीची तयारी दाखवल्याचे दिसले. हे घडले ते गृहमंत्री अमित शाहांच्या फोन सल्ल्यानंतरच! शेतकऱ्यांना नको असलेले तिन्ही कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला. सर्वोच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची तयारीही सरकारने दाखवली आहे. तसेच किमान हमी दरासाठीही एक नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीच्या शिफारशींनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

 

मात्र, केंद्र सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात पुढील बैठक २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता होणार असून, या बैठकीत शेतकरी संघटना सरकारच्या प्रस्तावावर आपले मत मांडणार आहेत. ‘शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचा प्रस्ताव मान्य केला तर दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ शकते’, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली. तसेच शेतकरी आंदोलकांनी २६ जानेवारीला आयोजित केलेली ट्रॅक्टर रॅली होईलच, असे स्पष्ट केले आहे.

 

विज्ञान भवनात कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी ४० शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळेस सरकार आमच्या प्रमुख मागण्यांबद्दल चर्चा करत नाही याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा तोमर यांनी प्रस्ताव ठेवले. तर शेतकऱ्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून बजावण्यात आलेल्या नोटिसचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला.


Tags: amit shahaFarmer protestFarmer protest 2020FarmerDelhiProtestnarendra singh tomarगृहमंत्री अमित शाहानरेंद सिंह तोमर
Previous Post

तीन कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

Next Post

“जगात जर्मनी भारतात परभणी”…मात्र पेट्रोलची इथं सर्वाधिक महागाई!

Next Post
pertol pump

"जगात जर्मनी भारतात परभणी"...मात्र पेट्रोलची इथं सर्वाधिक महागाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!